शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने झोडपले, पीक उत्पादनाने मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा 19.41 टक्के अधीक तर पावसाळ्यानंतरही अर्थात ऑक्टोबरअखेर एकुण 138.3 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा 19.41 टक्के अधीक तर पावसाळ्यानंतरही अर्थात ऑक्टोबरअखेर एकुण 138.3 टक्के पाऊस झाला आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या पावसामुळे सर्वच लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या 40 वर्षात कधीही 100 टक्के न भरलेले प्रकल्प देखील यंदा पुर्णपणे भरून त्यांच्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागला. दरम्यान, अतीपावसामुळे जिल्ह्यातील 50 टक्केपेक्षा अधीक क्षेत्रावरील खरीप पीक वाया गेले आहे. यंदा पावसाळ्याची सुरुवात निराशाजनक झाली होती. जून महिन्यात त्या महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत केवळ 45 टक्के पाऊस झाला होता. परिणामी  पेरण्या लांबल्या होत्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ब:यापैकी पाऊस झाल्याने पेरण्या उरकल्या. परंतु याच महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून पावसाने तुफान बॅटींग करण्यास सुरुवात केली ती सप्टेंबर महिन्याच्या अखेर्पयत कायम राहिली. पावसाळ्याचे चार महिने अर्थात सप्टेंबर महिना उलटला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. गेल्याच आठवडय़ात परतीच्या पावसाने दाणादान उडविली असतांना आता चक्री वादळामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा भितीचे काहूर उठले आहे. 22 वर्षात प्रथमच सरासरी पारजिल्ह्यात पावसाने प्रथमच सरासरी पार केली आहे. 22 वर्षापूर्वी जिल्ह्यात 104 टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती. ऑक्टोबर अखेर एकुण 138.3 टक्के पाऊस नोंदला गेला आहे. त्यानंतर 100 टक्केच्या आतच पाऊस राहिला   आहे. यंदा ऑगस्ट महिन्यातच सरासरीपेक्षा अधीक पाऊस नोंदला गेला आहे. गेल्यावर्षी तर अवघा 68 टक्के पाऊस झाल्याने दुष्काळाचे चटके जिल्हावासीयांना सहन करावे लागले होते. यंदा सर्वाधिक पाऊस नवापूर तालुक्यात नोंदला गेला आहे. त्या खालोखाल नंदुरबार, तळोदा,   शहादा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली आहे.खरीप गेले वायाअती पावसामुळे खरीप पीक वाया गेले आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यार्पयत पीक परिस्थिती उत्तम होती. यंदा पीक उत्पादनाचेही रेकॉर्ड मोडले जाईल अशी अपेक्षा शेतक:यांना होती. परंतु पीक परिपक्व होऊनही सततच्या पावसामुळे ते काढता येत नव्हते. शेतात मळणी व इतर कामे करता येत नव्हती. त्याचा परिणाम शेतातच    पीक वाया गेले. मका, बाजरी यांच्या कनसांना कोंब फुटले, सोयाबीन सडले. कापूस वाया गेला तर इतर तृणधान्य व कडधान्याचे उत्पादन निम्म्यावर आले. त्यामुळे जास्त   पाऊस होऊनही शेतक:यांना त्याचा फायदा होऊ शकला नसल्याची स्थिती आहे.पाणी टंचाई मात्र दूरजिल्ह्यातील नंदुरबार  तालुक्याचा पूर्व भाग, शहादा तालुक्याचा काही भाग तसेच दुर्गम भागात नेहमीच पिण्याच्या     पाण्याची टंचाई निर्माण होत असते. गेल्यावर्षी तर पुर्ण जिल्हाभरातच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी दाहिदिशा फिरण्याची वेळ आली होती. परंतु यंदा सरासरीच्या तुलनेत 40 टक्के  जास्त पाऊस झाल्याने,   सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि सर्वच लघु व     मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. याशिवाय विहिरी, कुपनलिका देखील तुडूंब भरल्या आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई यंदा राहणार नाही. त्यामुळे दुष्काळापासून जनतेची यंदा मुक्तता आहे.  यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बीची आशा शेतक:यांना लागून आहे. नदी, नाले अद्यापही प्रवाही आहेत. सर्वच प्रकल्प तुडूंब भरले आहेत. विहिरी, कुपनलिका देखील भरलेल्या आहेत. त्यामुळे रब्बीचे पीक तरी चांगले येईल या आशेवर शेतकरी आहेत. 4पिण्याच्या पाण्याची समस्या देखील यंदा मिटणार आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्प तुडूंब भरला आहे. शहादा व तळोद्याची तापीवरील पाणी पुरवठा योजनेलाही संजिवनी मिळणार आहे. गावोगावच्या पाणी योजना देखील यंदा वर्षभर सुस्थितीत चालणार असल्याचे संकेत आहेत.