शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:20 IST

नंदुरबार : गेली आठ ते १० दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, ...

नंदुरबार : गेली आठ ते १० दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने पेरणी केलेली खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून, दिवसेंदिवस मोकळे आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नंदुरबारचा पारा वाढल्‍याने ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव नंदुरबारकरांना येत आहे.

यंदा मान्सूनने हजेरी लावल्याने काही भागातील बळीराजा सुखावला होता. इतर भागात पेरण्‍या करण्‍यात आल्‍या. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. २१ जून रोजी सूर्याने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आणि पाऊस कमी झाला. या नक्षत्र काळात काही दिवस पाऊस राहिला; मात्र गेली आठ ते १० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शेतीच्‍या आंतरमशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. कपाशी पिकांना आता पाण्याची ओढ लागली आहे. मशागतीमुळे पिकांची मुळे हलकी झाली आहेत. त्यात उन्हाचा तडाका इतका प्रचंड आहे की, पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे, तसेच पिके कोमेजू लागली आहेत. आज पाऊस सुरू होईल, उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. इतर पिकाच्‍या पेरण्‍या खोळंबल्‍या आहेत. दिवसेंदिवस मोकळे आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ज्‍या शेतकऱ्याच्‍या विहिरींना व कुपनलिकांना पाणी आहे ते शेतकरी पाणी देऊन पेरलेली पिके जगवायची धडपड करीत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भात व नागलीच्या रोप लावणीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होते. भात लावणीला आला; मात्र पाऊस नसल्याने लागण करता येत नाही. आगामी तीन ते चार दिवस वातावरणात फारसा फरक दिसत नाही, त्यामुळे या कालावधीत पावसाची शक्यता धूसर असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.