शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

लोणखेडा परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

वीजपुरवठा मर्यादित असल्याने लागवड झालेल्या पिकांना वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसाळ्यातच बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरणी ...

वीजपुरवठा मर्यादित असल्याने लागवड झालेल्या पिकांना वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसाळ्यातच बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरणी केली असल्याने त्यांच्यापुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून आभाळ पूर्ण भरून येते. मात्र, पावसाच्या किरकोळ सरी वगळता दमदार पाऊसच येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईला पाऊस पडल्यास आपल्या परिसरात दोन ते तीन दिवसांत पाऊस येतोच, असा कयास बांधला जात होता व त्याप्रमाणे पावसाचे आगमन होत असे, असा अनुभव ज्येष्ठांनी व्यक्त केला. मुंबई तुडुंब भरली असतानाही आपल्या परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्याचा शेवट आल्याने खरीप हंगाम सापडणे शक्य नसल्याचे चित्र आहे. मूग, उडीद, चवळी, मठ यासारख्या कडधान्यांचे व ज्वारी, बाजरी, नागली यासारखी अन्नधान्य पिके हातची गेल्याची स्थिती आहे. लोणखेडा गावालगत असलेली गोमाई नदी अजूनपर्यंत दुथडी वाहलेली नाही. या नदीच्या उगमाकडे थोडाफार पाऊस झाल्याने मुक्या जनावरांना पुरेल एवढे पाणी नदीला आलेले आहे. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय परिसरात केले जात आहेत. लवकरच पाऊस येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.