शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आईची काळजी वाढली; काळजावर दगड ठेवून मुलांना पाठविले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना या जीवघेण्या साथीची लाट पसरल्यामुळे शासनाच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : कोरोना या जीवघेण्या साथीची लाट पसरल्यामुळे शासनाच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा १५ जुलैपासून जवळपास सर्वच ठिकाणी सुरू झाल्या आहेत. तथापि ही लाट अजून पूर्णपणे कमी झालेली नाही. अशा विदारक स्थितीत केवळ आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी ती माता स्वतःच्या काळजावर दगड ठेवून त्यांना शाळेत पाठवत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा फटका लहान बालकांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच बसला होता. यातून कसे बसे सावरत यंदा तरी ते सुरळीत होईल, याची आशा पालकांना लागून होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या लाटेने पालकांच्या आशेवर पूर्ण पाणी फेरले. आता त्याची लाट ओसरली असल्यामुळे राज्य सरकारने ज्या ठिकाणी एकही रुग्ण नाही, अशा ठिकाणी १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवण्याबाबत पालकांचे दुमत आहे. त्याबाबत अजूनही त्यांच्या मनात भीती आहे. विशेषत: मातांमध्ये हे चित्र प्रकर्षाने जाणवते. केवळ आपल्या बालकाचे शिक्षण बुडू नये, तो त्यापासून वंचित न राहता त्याच्यावर विपरित परिणाम होऊ नये, या एकमेव काळजीपोटी आपल्या काळजावर दगड ठेवून मोठ्या अंतःकरणाने त्यांना शाळेत पाठवावे लागत असल्याची व्यथा काही मातांनी बोलून दाखवली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षीदेखील मुलांच्या शिक्षणात मोठा खंड पडला होता. ऑनलाईन शिक्षणाचा फारसा उपयोग झाला नाही. यंदा त्याचे वातावरण निवळेल, अशी अशा होती. परंतु प्रचंड वाढले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजूनही मुलांना शाळेत पाठवण्याबाबत मनात धाकधूक आहेच. शिक्षण महत्त्वाचं असल्याने नाईलाजास्तव पाठवावे लागत आहे. - गायत्री जगदाळे, रांझणी, ता. तळोदा.

या जीवघेण्या कोरोनाची साथ केव्हा जाईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे आता आपल्याही जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. हा दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांना त्याबाबतची जाणीव करून मुलांना शाळेत पाठवत आहे. तरीही मुले घरी येईपर्यंत काळजी असतेच. -पूजा चव्हाण, तळोदा.

कोरोनाची प्रचंड दहशत मनात आहे. मात्र, शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे. बाल वयात मुलगा शिक्षणापासून लांब राहिला तर त्याच्यावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे मनात कटुता असताना त्याला शाळेत पाठवावे लागत आहे. - सुवर्णा शिंदे, आई, मोड, ता. तळोदा.

शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघोळ करा

शाळा सुटल्यानंतर आपली मुले, मुली घरी सुरक्षित येण्याची वाट सर्वच आया आतुरतेने पाहात असतात. त्यापूर्वी आंघोळीसाठी गरम पाणी करून ठेवलेलेच असते. कपडे काढून त्याला लगेच आंघोळ घातली जाते. त्यापूर्वी शाळेत आपल्या पाल्यांना पाठवताना प्रत्येक माता सॅनिटायझर, मास्क, पाण्याची बाटली या वस्तू सोबत देऊन वर्गात सामाजिक अंतर राखण्याची जाणीव करून देत असल्याचे सांगतात. कोरोनामुळे बालकांना आंघोळ घालण्याचा नित्यक्रम झाल्याचे काही मातांनी बोलून दाखवले. कोरोनाबरोबर चालायची सवय आता लावून घ्यावी लागणार असल्याचे मातांनी सांगितले.

अ) मास्क काढू नये. ब) वारंवार साबणाने हात धुवावा किंवा सॅनिटायझर वापरावे. क) सोशल डिस्टन्सिंग पाळावे. ड) शाळेतून आल्यावर कपडे धुवायला काढणे व आंघोळ करावी.

जिल्ह्यातील एकूण शाळा

३६२ असून, त्यात १५ जुलै रोजी पहिल्या दिवशी १८९ सुरू, तर १७३ शाळा बंद होत्या.