शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
2
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
3
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
4
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
5
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
6
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
7
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
8
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
9
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
10
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
11
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
12
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
13
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
14
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
15
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
16
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
17
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
18
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
19
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
20
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची सूरी येऊ लागली गळा तरीही सरकारी बाबूंना लाचेचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

विविध शासकीय योजना तसेच कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसह इतर विभागातील किरकोळ कामांसाठी काही हजार ते काही लाख रुपयांची लाच घेण्याचे ...

विविध शासकीय योजना तसेच कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसह इतर विभागातील किरकोळ कामांसाठी काही हजार ते काही लाख रुपयांची लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत. खुर्चीला मान म्हणून अनेक जण काम होत आहे, या एकाच अपेक्षेने हातात असलेली रक्कम देऊन स्वत:चा मार्ग मोकळा करुन घेतात. शाॅर्टकट मार्गाने पैसे मिळतात, म्हणून अनेक जण लाचेची मागणी करून स्वत:चं भलं करून घेत आहेत. अशा लाचखोरांना धडा शिकवणारेही काही आहेत. त्यांच्या पुढाकाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सद्या जिल्ह्यात काम करत असून त्यांच्याकडून सातत्याने कारवाई करुन लाचखोरांवर गुन्हेही दाखल होत आहेत. विभागाला समक्ष किंवा निनावी माहिती दिल्यानंतर ही कारवाई होत आहे. २०१८ मध्ये अपसंपदा बाळगणाऱ्या दोघांवर विभागाने गुन्हे दाखल केले होते. दोघेही नंदुरबार शहरातील होते. चाैकशीअंती अपसंपदा असल्याचे सिद्ध झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आले आहे. दरम्यान कमी श्रमात अधिक पैसा मिळू लागल्याने वाढीव खर्च करण्याच्या नादात अनेक जण हिमतीने लाचेची मागणी करतात. अशा तक्रारी संबंधित विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची पूर्णपणे चाैकशी करूनच पुढील कारवाई होत आहे. गेल्या चार वर्षात ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोरांमध्ये सर्वाधिक संख्या ही महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आहे. त्याखालोखाल पोलीस व इतर विभागाचे कर्मचारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. किरकोळ रकमेच्या मागणीचे हे गुन्हे आहेत.

महसूल विभागात सामान्य नागरिकांची अनेक प्रकारची कामे असतात. या कामांसाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच इतर कार्यालयांमध्ये वेळोवेळी जाणाऱ्यांना लाचखोरीचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे. भूमी अभिलेख विभाग, पोलीस दलातील किरकोळ कामांसाठी अनेकांना लाच देणे योग्य न वाटल्याने त्यांनी तक्रारी दिल्यानंतर लाचखोरांनाना ताब्यात घेण्यात आले होते.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात झालेल्या कारवायांमध्ये सर्वच विभागातील कर्मचारी आहेत. यात सर्वाधिक कर्मचारी हे महसूल विभागाचे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या जिल्ह्यात तब्बल पाच जणांची गुप्त चाैकशी सुरू आहे. तर दोघांवर कारवाईची शक्यता आहे. हे पाच जण कोण याची अद्याप माहिती समोर आली नसली तरी लाचखोरीतून अपसंपदा गोळा करू पाहणाऱ्यांवरच ही कारवाई होणार असे निश्चित आहे.

शासनाकडून कर्मचाऱ्यांना इमानदारीने कर्तव्य पार पाडून सामान्यांची सेवा करावी या उद्देशाने सातत्याने समुपदेशन करण्यात येते. परंतु बदलत्या काळानुसार खर्च करण्याची सवय झालेल्यांकडून लाचखोरीला वाव मिळेल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. लाचेची मागणी करणाऱ्या विरोधात लिखित तक्रारी आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यात लाचेची मागणी करणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी विभागाकडून हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या लाचेच्या मागणीची तक्रार किंवा माहिती देता येणार आहे. विभागाकडून दरवर्षी यासाठी विशेष पंधरवाड्याचे आयोजन करून शाळा, महाविद्यालय, बसस्थानके यासह विविध सार्वजनिक ठिकाणी शिबिरे घेण्यात येऊन लाचखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जातो.

चार वर्षात सातत्याने लाचखोरांना ताब्यात घेतले जात आहे. येत्या काळातही हे सत्र सुरूच राहणार आहे. नागरिकांनीही लाचेच्या मागणीला प्रतिसाद न देताना पुढाकार घेतल्यास या समस्येचे निराकारण होऊन स्वच्छ प्रशासन कामाला येऊ शकते. प्रत्येकाने याबाबत काळजी घेत कामकाज करावे.

- शिरीष जाधव, उपअधीक्षक,एसीबी, नंदुरबार