शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम तलावातील मूर्तीचे केले तापी नदीत विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणच्या कृत्रिम तलावात करण्यात आलेल्या मूर्ती विसर्जनानंतर तलावांची स्वच्छता करण्यात ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्यात तीन ठिकाणच्या कृत्रिम तलावात करण्यात आलेल्या मूर्ती विसर्जनानंतर तलावांची स्वच्छता करण्यात आली. मूर्ती एकत्रीत करून त्या एका वाहनाद्वारे तापी नदीत विसर्जनासाठी नेण्यात आल्या. आता अनंत चतुदर्शीच्या दिवशी या तलावांच्या ठिकाणी आणखी सोयी केल्या जाणार आहेत. दरम्यान, सोनी विहिर परिसरात असलेले उकिरडे व घाणीचे साम्राज्य हटवावे अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
नंदुरबारात गुरुवारी पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन पार पडले. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेतर्फे चार ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. पैकी एक तलाव गैरसोयीचा असल्याने लागलीच बुजविण्यात आला होता. त्यामुळे साक्रीनाका भागातील दसेरा मैदानाजवळील तलाव, नळवा रस्त्यावरील वैशाली नगर भागात आणि निझर रस्त्यावर सी.बी.पेट्रोलपंप मागील जागेवरील तलावात मूर्ती विसर्जन करण्यात आले. त्या ठिकाणी गुरुवारी दिवसभर मूर्ती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी कायम होती.
या तलावात विसर्जीत करण्यात आलेल्या मूर्ती आणि निर्माल्य काढण्याचे काम शुक्रवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले. मूर्ती गोळा करून त्या एका वाहनाद्वारे तापी पात्रात विसर्जनासाठी नेण्यात आल्या. याशिवाय तलावातील आणि परिसरातील स्वच्छता देखील करण्यात आली.
काल राहिलेल्या त्रुटी अनंत चतुदर्शीला दूर करण्यात येतील. त्यासाठी नियोजन करून काम करण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.
सोनी विहिर परिसरात घाणीचे साम्राज्य
याशिवाय मानाच्या गणपतींच्या मूर्ती विसर्जन करण्यात येणाºया सोनी विहिरीतील गाळ आणि इतर घाण पालिकेने काढली. विहिरीत पाणी टाकण्यात येत आहे. अनंत चतुदर्शीला या ठिकाणी दादा, बाबा व इतर मानाच्या मूर्र्तींचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे या विहिरीच्या परिसरात देखील आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, या ठिकाणी गुरे बांधण्यात येतात. कचरा, शेण यांचा ढिगारा या ठिकाणी असतो. दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणावर असते.
मानाच्या बाप्पांना निरोप देतांना या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहावे यासाठी या ठिकाणचे उकिरडे आणि इतर घाण हटविण्यात यावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे. जे रहिवासी व गुरे मालक ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. अनंत चतुदर्शीच्या दिवशी मोठ्या संख्येने मूर्ती विसर्जन होणार आहे. त्यामुळे कृत्रिम तलावांच्या ठिकाणी आणखी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
निर्माल्य संकलनासाठी देखील पालिकेने वेगळी व्यवस्था करावी. काल अनेकांनी मूर्ती सोबत निर्माल्य देखील तलावात टाकल्यामुळे दुसºया दिवशी पालिकेला स्वच्छता करावी लागली.