शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुपारनंतर कधीही करा मूर्तीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनंत चर्तुदर्शीला होणारे दुपारी १२ नंतर आरती करुन चार वाजेनंतर विसर्जन करण्याची योग्य वेळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनंत चर्तुदर्शीला होणारे दुपारी १२ नंतर आरती करुन चार वाजेनंतर विसर्जन करण्याची योग्य वेळ असल्याचे मत ज्येष्ठ पुरोहित मधुकर जोशी यांनी मांडले आहे़ यंदा साधेपणाने होणारा गणेशोत्सव आणि घरीच बाप्पाचे विसर्जन या संदर्भात ‘पौरोहित्य’ करणाऱ्या ब्रह्मवृंदाचे मत जाणून घेतले होते़
शहरासह जिल्ह्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे़ यात पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन पूूर्ण करण्यात आले आहे़ आता फक्त काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे़ प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार मंडळांकडून मिरवणूक न काढता विसर्जन होणार आहे़ पालिकांकडून घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे़ यात घरगुती बाप्पाचे घरीच विसर्जन करावे अशा सूचना आहेत़ या पार्श्वभूमीवर शहरातील पुरोहितांसोबत चर्चा केली असता, मूर्तीचे वाहत्या पाण्यात साधेपणाने विसर्जन योग्य असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़
दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, वीस वषार्पूर्वी गणपती मूर्ती दान आणि निर्माल्य दान करा ही मोहीम सुरू केली. सण-समारंभ आणि उत्सवांना पर्यावरणपूरक रूप देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या मोहिमेला सुरुवातीला विरोधाला सामोरे जावे लागले. पण हळूहळू या मोहिमेची उपयुक्तता समाजाला पटत गेली़
विसर्जित मूर्ती दान आणि निर्माल्य संकलन हे समाजाने मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे. गणपतीची मूर्ती पार्थिवाची म्हणजे पृथ्वी पासून अर्थात मातीची असावी असा धर्मशास्त्राचा संकेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काही वर्षांपूर्वी तसा आदेश दिला आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे़ अशाच स्वरूपाचा एक आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील दिला आहे़ आज महानगरपालिका, नगरपालिका या क्षेत्रामध्ये सकारात्मक भूमिका याचमुळे बजावताना दिसतात. अनेक ठिकाणी निर्माल्य संकलन व विसर्जित मूर्ती संकलन केंद्रे नगरपालिकांनी सुरू केलेली आहेत. हा बदल उल्लेखनीय असल्याचे मत त्यांच्याकडून मांडण्यात आले़


गणेशमूर्ती दान ही मोहीम आज शासनाच्या धोरणाचा भाग बनली आहे. याचा संघटना म्हणून आनंद आणि समाधानाची भावना आहे. राज्यात एक कोटी कुटुंबात गणरायाची प्रतिष्ठापना करतात़ सक्तीची वर्गणी वसुली, गुलालाची उधळण, थर्माकोलचा वापर, कानठळ्या बसवणारा आवाज या अशा अनेक बाबी कोरोनाच्या प्रभावाने आपोआप टळल्या आहेत. पण याबाबतही प्रबोधन करण्याची आजही गरज जाणवते.
-विनायक सावळे, सरचिटणीस, महाराष्ट्र, अंनिस


घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करणे शास्त्रसंमत नाही़ स्थापन केलेल्या मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले पाहिजे़ यातून माती पाण्यात विरघळून ती प्रवाहित होते़ यातून पाण्याला वरदान प्राप्त होते़ घरीच किंवा थांबलेल्या पाण्यात गणपती मूर्ती विसर्जन केल्यास ते पायदळी येण्याचा धोका असतो़ यामुळे शक्यतो वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित करणे योग्य राहिल़ दुपारी चार वाजेनंतर कधी गणेश मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते़
-मधुकर जोशी, ज्येष्ठ पुरोहित, नंदुरबाऱ