शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील होलीकोत्सवास आज पासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील होळी मनसोक्त नाचायला, गायला लावणारी ठरते. यानिमित्त दु:खावर पडदा पाडत असून अनेक संकटे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील होळी मनसोक्त नाचायला, गायला लावणारी ठरते. यानिमित्त दु:खावर पडदा पाडत असून अनेक संकटे विसरुन आदिवासी बांधवांकडून आनंदाचा शोध घेतला जात आहे. गावाबाहेर गेलेली मंडळी मूळगावी परतले आहे. सर्वांच्या सहभागाने होळी गीते सुर धरु लागली तर गावागावात होळीनृत्यही फेर धरु लागले आहे. त्यामधूून निसर्ग नियमांवर आधारित जीवन पद्धती व जीवनमूल्ये मांडली जात आहे.सादर होणारी गीते सातपुड्यातील आदिवासींना सुखसमृद्धीचा संदेश देत आहे. व्रत पाळणाऱ्या कलाकारांनी देखील त्यांना लागणाºया साहित्यांची जुडवा-जुडव करीत सहभाग नोंदवित आहे. होळीतील प्रमुख आकर्षण ठरणाºया मोरखीला डोक्यावर मोरपीसे, कमरेला बांधण्यासाठी पितळी घुंगरु, वाजविण्यासाठी खाट (माठाच्या काठेवर चामडे बांधलेले वाद्य). बावा या कलाकारास बांबूपासून निर्मित सजवलेला टोप, कमरेला बांधण्यासाठी दुधी भोपळे, लाकडी तलवारी, दोन्ही खांद्यावरुन छाती-पाठीवर गोलाकार स्वरुपात व दोन्ही हाताच्या मनगटावर बांधण्यासाठी पिंपळवर्गिय फळ (खोंदे) फळांची माळ, दोन्ही पायात बांधण्यासाठी छोटे धुंगरु तर ढाणका डोकोअं यास परकर व ब्लाऊज, एका हातात बांबूपासून निर्मित सुपडी, लाकडी मोठा चमचा (साटा), मोरावाल्याला धनुष्य, बाण व पाठीमागून कमरेला बांधण्यासाठी एक घुंगरू आदी तर प्रत्येकाला हातात व गळ्यात परिधान करायला चांदिचे दागिने साहित्य शिवाय स्वत:च्या चादरी, कपडेलत्ते देखील आवश्यक असते. त्यानुसार त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे.आदिवासी देव-देवतांची भूमी असलेल्या मोरी राही (डाब, ता.अक्कलकुवा) येथे दि.५ मार्च रोजी संपूर्ण आदिवासींच्या साक्षीने देवाने सुरू केलेली होळी साजरी करण्यात येणार आहे. दि. ६ रोजी डाब ग्रामस्थ व धडगाव तालुक्यातील काकरपाटी, बोदला, खांडबारा, खेतीया (मध्यप्रदेश) येथील होळी साजरी करण्यात येणार आहे. असे नियोजित तारखेनुसार प्रत्येक गावांची होळी साजरी होणार आहे. प्रत्येक गावाची होळी ही पहाटे पहिला कोंबडा आरवताच होळी पेटवली जाणार आहे.प्रत्येक गावाच्या होळीत अनेक ढोल दाखल होणार असून ढोलवर पहिली थाप पडताच महिला-पुरुष परंपरेनुसार नृत्यांचा फेर धरतील. रात्रभर नाच-गाणे सादर करीत वर्षभरातील दु:ख, असंख्य संकटांवर मात करण्याचा प्रयत्न होणार आहे.होळी पेटल्यानंतर सकाळी बाहेरगावाहून आलेले बंधू-भगिनी, मोरखी (कलाकार), ढोल वादक-मालक यांची भोजन व अन्य सुविधा पंपरेनुसार ग्रामस्थांच्या एकजुटीने करण्यात येईल. सकाळी ११ वाजेपासून पुन्हा मेलादा (एकप्रकारची यात्रा) सुरू होईल. पोलीस पाटलांच्या घरी पूजा करून सर्वांच्या साक्षीने सायंकाळपर्यंत अखंड मेला (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. अन् त्या -त्या गावातील होळीचा निरोप घेतला जाईल. निरोप घेतानाच पुन्हा दुसºया गावातील होळीसाठी पुन्हा सात वाजेपर्यंत त्या-त्या गावात हे आदिवासी बांधव पोहोचतील, तेथेही परंपरेनुसारच हाळी साजरी होईल.