शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांची नंदुरबारात होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST

केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन काळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. यासाठी संपूर्ण देशभर या कायद्याच्या विरोधात ...

केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन काळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. यासाठी संपूर्ण देशभर या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. देशातील लाखो शेतकरी दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. जिवाची बाजी लावत लढत आहेत. आतापर्यंत सात शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. देशातील ५०० जनसंघटना मिळून किसान संयुक्त मोर्चा स्थापन करून हे आंदोलन सुरू केलेले आहे, तरीही केंद्र सरकारने हे कायदे रद्द केलेले नाहीत. उलट सर्वोच्च न्यायालयामार्फत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयाने कायदे पूर्णतः रद्द करण्याऐवजी त्याला फक्त स्थगिती दिली आहे व जे कृषी कायदे व भाजप सरकारच्या धोरणाचे समर्थक आहे, त्यांची समिती गठीत करून बड्या उद्योगपती व कॉर्पोरेट लॉबीचे काम सोपे करीत आहेत. हे शेतकऱ्यांना अमान्य आहे. या तथाकथित कमिटीचा धिक्कार करून या कायद्याच्या प्रतींची होळी करण्यात आली. या आंदोलनात अरुण रामराजे, नाना ठाकरे, रवी मोरे, सुनील साळवे, कैलास पेंढारकर, दीपक भालेराव, दगा भगा मोरे, विजय पवार, बापू ठाकरे, विजय पवार, वनाशीबाई ठाकरे, अरुणाबाई भिल, सुकमाबाई भिल यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष गवई गट, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.