शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात जनजागृतीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST

नंदुरबार तालुक्यात हरभरा कापणीला वेग लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध भागांत हरभरा कापणीला वेग आला आहे. ऊन वाढू ...

नंदुरबार तालुक्यात हरभरा कापणीला वेग

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध भागांत हरभरा कापणीला वेग आला आहे. ऊन वाढू लागल्याने शेतकरी कापणीला गती देत असून, कापलेला हरभरा खळवाडींमध्ये सुकवण्यासाठी टाकला जात आहे. यामुळे मजुरांनाही कामे मिळत आहेत.

दुर्गम भागातील पाणीटंचाईची दखल घ्यावी

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील पाड्यांवर सालाबादाप्रमाणे यंदाही पाणीटंचाईची झळ बसण्याची चिन्हे आहेत. टंचाईयुक्त गावांमध्ये उपाययोजना करण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गाव-पाड्यांवरून सुचविण्यात आलेल्या हातपंप व पाणी योजनांचे कामकाज पूर्ण करण्याची मागणी असून, प्रशासनाने याचा आढावा घ्यावा अशी अपेक्षा आहे.

बसस्थानकात गर्दी

नंदुरबार : रविवारी शहरात विवाह सोहळ्यांची रेलचेल असल्याने नंदुरबार बसस्थानकात गर्दी दिसून आली. ग्रामीण भागासह जिल्ह्यातील विविध भागांतून प्रवासी याठिकाणी आले होते. यातून बसेसलाही गर्दी होती. दरम्यान, यावेळी मास्क लावण्याच्या सूचना एसटी महामंडळाकडून केली जात होती.

रसवंती गृहे सुरू

नंदुरबार : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागांतील रसवंतीगृहे सुरू झाली आहेत. उन्हाळ्यात उसाच्या रसाला मोठी मागणी असल्याने जागोजागी रसवंतीगृहे सुरू होतात. जिल्ह्यातील विविध शहरांसह मुख्य मार्गांवर ही रसवंतीगृहे सुरू करण्यात आली आहेत.

कृषी विभागाच्या बंधाऱ्यांची दुर्दशा

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात २०१५ ते २०१९ या काळात बांधकाम करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारांतर्गत बंधाऱ्यांची दुर्दशा झाल्याचे त्या-त्या गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काहीकाळ पाणीसाठा झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हे बंधारे निरुपयोगी ठरत आहेत. बंधाऱ्यास भेगा पडून पाणी वाहून जात असल्याने हे बंधारे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी निरुपयोगी ठरत आहेत.

फळबाजारात कैरी वेधत आहे लक्ष

नंदुरबार : बाजारपेठेत कैरीचे आगमन सुरू झाले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील आंबा झाडांवर लगडलेल्या कैऱ्या तोडून त्या विक्रीसाठी आणल्या जातात आहेत. आवक कमी असल्याने कैरीचे दरही वाढीव असल्याचे सांगण्यात आले.

मास्क नसल्यास रिक्षातून प्रवासाला बंदी

नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र चिंता आहे. सर्वत्र उपाययोजना सुरू आहेत. शासनाच्या या उपाययोजना एकीकडे सुरू असताना नंदुरबार शहर ते प्रकाशा यादरम्यान वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षावर मास्क नाही त्याला प्रवेश नाही असे लिहून घेत उपाययोजनांची सक्ती केली आहे. हा रिक्षाचालक सध्या काैतुकास पात्र ठरला असून, रिक्षात बसणाऱ्या प्रत्येकाला मास्क गरजेचा का, आहे याची माहिती देत कोरोनाबद्दल माहितीही देत आहे.