शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: काँग्रेसने ऐनवेळी उमेवार बदलल्याने लढतीत आले टि¦स्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:03 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक व्टिस्ट निर्माण होऊन भाजप ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक व्टिस्ट निर्माण होऊन भाजप आमदाराने थेट राजीनामा देत काँग्रेसकडून उमेदवारी मिळविल्याने नंदुरबारची लढत आता रंगतदार ठरली आहे. गेल्या पाच वर्षात एकाच पक्षात सोबत काम केलेले आणि सोबत आमदार राहिलेल्या दोन उमेदवारांमध्ये होणारी ही लढत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे. नंदुरबार मतदारसंघात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचे विरोधक व काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदारकीचा राजीनामा देत थेट शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील निवडणूक युतीसाठी पर्यायाने डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासाठी सोयीची ठरल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु शहाद्याचे भाजप आमदार उदेसिंग पाडवी यांचे तिकीट कापल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लागलीच त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली. काँग्रेसने आधी या ठिकाणी दुसरा उमेदवार जाहीर केला होता. त्याऐवजी ऐनवेळी उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे मतदारसंघातील लढत ही रंगतदार ठरली आहे. असे असले तरी उदेसिंग पाडवी यांना हा मतदार संघ पुर्णत: नवीन आहे. त्यांचा फारसा संपर्क देखील या भागात नाही. त्यामुळे त्यांना मेहनत घ्यावी लागत आहे. डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दीपा वळवी, स्वाभिमानीचे अॅड. प्रकाश गांगुर्डे आणि बसपाचे विपूल वसावे हे देखील रिंगणात आहेत. काँग्रेस महाआघाडीत स्वाभिमानी असतांनाही त्यांच्या उमेदवाराने या ठिकाणी माघार घेतलेली नाही. डॉ.विजयकुमार गावीत हे गेल्या 25 वर्षापासून या भागाचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे त्या कामांच्या जोरावर त्यांनी प्रचार सुरू केला आहे. तर भाजपच्या नाराज गटातील, रघुवंशींसोबत न गेलेले कार्यकत्र्याना घेवून उदेसिंग पाडवी देखील प्रचाराला लागले आहेत. वंचीतनेही आपल्या प्रभाव क्षेत्रात प्रचार सुरू केला आहे. 

तापी-बुराई उपसा योजनेचे कामाला गती देण्यात आली, येत्या पंचवार्षीकमध्ये हे काम पुर्ण करण्याचा मनोदय.तापीवरील 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करून आणत त्या कामांना सुरुवात. वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा नव्याने मंजुर करून पुढील वर्षापासून ते कार्यान्वीत करण्याचा संकल्प.खासदारांच्या माध्यमातून नंदुरबारला जोडणा:या सहा महामार्गाना मंजुरी.येत्या काळात नंदुरबारची एमआयडीसी कार्यान्वीत करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प.

25 वर्षापासून प्रतिनिधीत्व करीत असतांनाही एमआयडीचा प्रश्न सुटू शकला नाही. एकही उद्योग येवू शकला नाही.चिली पार्कचे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कुठल्याही कामाची सुरुवात नाही.सरकारने शेतक:यांची कजर्माफी केली, परंतु अनेक शेतकरी अद्यापही त्यापासून वंचीत असल्याचा मुद्दा.तापीवरील उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत. 

लढतीतील सहा उमेदवार व त्यांचे पक्ष विजयकुमार कृष्णराव गावीत (भाजप), उदेसिंग कोचरू पाडवी (काँग्रेस), अॅड.प्रकाश गांगुर्डे (स्वाभिमानी पक्ष), दीपा वळवी (वंचीत बहुजन आघाडी), विपूल वसावे (बहुजन समाज पार्टी), आनंदा सुकलाल कोळी (अपक्ष)