शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेपाडा शिवारातील ३०० हेक्टरचे वनक्षेत्र जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

सोमवारी रात्री लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. वनविभागाचे अधिकारी व ठाणेपाडा ग्रामस्थ यांच्या अथक ...

सोमवारी रात्री लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. वनविभागाचे अधिकारी व ठाणेपाडा ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमातून मंगळवारी सकाळी आठ वाजता ही आग विझवण्यात यश आले. दरम्यान, प्राथमिक अहवालानुसार २५० हेक्टरवर लागवड करण्यात आलेले बांबू रोपवन, सागाची झाडे, गवत आणि ५० हेक्टरवरची पूर्ण क्षमतेने वाढलेली खैरची झाडे आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह वनपाल व वनरक्षक हे रात्रीपासून या परिसरात होते. सकाळी आग आटोक्यात आल्यानंतर ठाणेपाडा रोपवाटिकेच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात आगीचे पंचनामे करण्यात आले. यात सायंकाळपर्यंत पथकांना केवळ १४ हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचता आले होते. बुधवारी उर्वरित ठिकाणी पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत ठाणेपाडा गावाच्या परिसरात शेकडो हेक्टरवर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. या ठिकाणी ही आग लागली होती. ठाणेपाडा गावातील ग्रामस्थांना प्रारंभी वणवा पेटल्याचे दिसून आले. काही वेळात ही आग वाढून साक्री ते नंदुरबार रस्त्याच्या दुतर्फा पोहोचली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती ते दाखल झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व ठाणेपाडा गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु करण्यात आले होते. सर्वांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी आग आटोक्यात आली.

या जंगलात दोन बिबट, काळवीट, सायाळ आणि ५०० पेक्षा अधिक मोर आहेत. हे सर्व प्राणी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी सकाळपासून या भागात पंचनामे करत आहेत. दरम्यान, एका मोराला आगीची झळ बसल्याची माहिती देण्यात आली आहे.

आगीत खाक झालेले बांबू व खैर झाडांचे रोपवन वनविभागाचा अनोखा प्रकल्प होता. यातील गवताची उंची ही पाच फुटांपेक्षा अधिक होती. तसेच सागाची पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाची झाडेही आगीत जळून खाक झाली आहेत.

दरम्यान, आग लागली किंवा लावली गेली याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.