शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित व भटक्या जाती, विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींचा भत्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता यंदा बंद करण्यात आला आहे. शाळा बंद असल्याने हा निर्णय ...

नंदुरबार : जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता यंदा बंद करण्यात आला आहे. शाळा बंद असल्याने हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात या विद्यार्थिनींना थोडाफार आधार मिळू शकला असता तो देखील हिरावला गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींना दरवर्षी उपस्थिती भत्ता दिला जात असतो. दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षाला २२० रुपये भत्ता दिला जात होता. यावर्षी मात्र कोरोनाचे कारण सांगून हा भत्ता बंद करण्यात आल्याच्या सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना मिळणारा थोडाफार आर्थिक आधार देखील बंद झाला आहे. कोरोनाच्या काळात तरी बंद केला गेला नव्हता पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार विद्यार्थिनींना बसणार आहे. दरवर्षी साधारणत: ३६ ते ४० हजार विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत असतात. सर्वच अर्थात ८० टक्के विद्यार्थिनी या साधारण कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना या भत्त्याचा बऱ्यापैकी लाभ होत असतो. या निर्णयामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

दिवसाला एक रुपया तोही केला बंद...

n महागाईच्या जमान्यातही जुन्याच निर्णयाप्रमाणे एक रुपया भत्ता दिला जात आहे. त्यामुळे एकप्रकारे शासन अशा विद्यार्थिनींची थट्टाच करीत आहे.

n दिवसाला एक रुपया आणि वर्षाला केवळ २२० रुपये यात विद्यार्थ्यांचे कोणते शालेय साहित्य खरेदी होईल याबाबत आश्चर्य व्यक्त होते. असे असले तरी विद्यार्थिनीच्या कुटुंबाला तो एक आधार समजला जात होता.

कोरोना काळात विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद करणे योग्य नाही. मुळात अशा महागाईच्या काळात एक रुपया भत्ता देणे म्हणजे मजाक करणे होय. त्यामुळे किमान पाच रुपये दिवसाला करावा, अशी मागणी आहे. भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे याबाबत मागणी लावून धरणार आहोत. शिवाय शिक्षक परिषदेनेही आवाज उठविला आहे.

-पुरुषोत्तम काळे, प्रदेश मुख्य संघटक,भटके विमुक्त हक्क परिषद.