शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

समाजकार्य महाविद्यालयाचे ९० टक्के विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 1:05 PM

  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  येथील समाजकार्य महाविद्यालयातील ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून या प्रकाराची चौकशी होऊन ...

  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  येथील समाजकार्य महाविद्यालयातील ९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून या प्रकाराची चौकशी होऊन विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी अभाविपने कुलगुरुंकडे केली आहे.सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मानसिकता नसताना शासन-प्रशासन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी खेळत होते. पण अशाही परिस्थितीत समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पदवीचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑक्टोबर २०२० मध्ये बी.एस.डब्ल्यू. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा दिल्या. परंतु विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींमुळे पदवी पूर्ण करणारे, भविष्याची दिशा आणि दशा ठरवण्याच्या वर्षात ( हेल्थ सिस्टम इन इंडिया) या एकाच विषयात समाजकार्य महाविद्यालयाचे जवळपास ९० टक्के विद्यार्थी नापास झालेले आहेत. या विषयाची दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने  विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणी दूर करून जवळपास ९० टक्के विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा यासाठी तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.  या विषयाची चौकशी करून विद्यार्थ्यांचे सुधारित निकाल विद्यापीठाने लवकर लावावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या वेळी अभाविपचे तळोदा शहरमंत्री प्रेम माळी यांनी दिला. यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक नीलेश हिरे, ललीत देसले, राहुल पाटील, दीपक पाडवी, देवीसिंग ठाकरे, शुभम पाटील, सागर वळवी, पृथ्वीराज चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.