शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीतून पाच पाणीपाळ्यांची मागणी असताना तीन पाणीपाळ्यांचेच नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात यावर्षी पुरेसा पाणीसाठा असतानाही शेतकऱ्यांना आवश्यक तेवढ्या पाणीपाळ्या दिल्या जात नाहीत. शेतकऱ्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात यावर्षी पुरेसा पाणीसाठा असतानाही शेतकऱ्यांना आवश्यक तेवढ्या पाणीपाळ्या दिल्या जात नाहीत. शेतकऱ्यांची पाच पाणीपाळ्यांची मागणी असताना केवळ तीन पाणीपाळ्या देण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. त्याला शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला असून, पाच पाणीपाळ्यांचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून कै. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पाला ओळखले जाते. विष्णूपुरी प्रकल्प, अंतेश्वर बंधारा व दिग्रस बंधारा हे तिन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. नांदेडच्या नागरिकांना पिण्यासाठी ३५ दशलक्ष घनमीटर पाणी व उर्वरित पाणी शेतीसाठी असे एकूण १४४ दशलक्ष घनमीटर पाणी या तिन्ही प्रकल्पांमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी फक्त तीन पाणीपाळ्या जाहीर करून १७ दशलक्ष घनमीटर पाण्याचाच उपयोग कालव्यांसाठी होत आहे, उर्वरित १०४ दशलक्ष घनमीटर पाणी कुठे मुरतेय, असा प्रश्न शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. रब्बी पिकांसाठी कमीत कमी पाच पाणीपाळ्या कालव्यांना द्याव्यात, अशी मागणी मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, शिराढोण व डेरला लिफ्ट योजनेचे लाभार्थी आहोत. विष्णूपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यात ८४ दशलक्ष घनमीटर पाणी आहे तसेच डिग्रस धरणाचे ४० टक्के पाणी म्हणजे ३० दशलक्ष घनमीटर पाणी नांदेडच्या नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित आहे. अंतेश्वर बंधाऱ्यात ३० दशलक्ष घनमीटर पाणी आहे, असे एकूण नांदेडच्या नागरिकांना पिण्यासाठी ३५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे व औद्योगिक वापरासाठी ५ दशलक्ष घनमीटर पाणी असे एकूण ४० दशलक्ष घनमीटर पाणी ठेवले तरीही विष्णूपुरी, अंतेश्वर, डिग्रस बंधाऱ्यात १४४ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. त्यातील ४० दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी सोडले तरी १०४ दशलक्ष घनमीटर पाणी शेतकऱ्यांना कायदेशीररित्या मिळायला हवे. त्यात प्राधान्यक्रमाने कालव्याचे लाभार्थी व बॅक वॉटरवरील शेतकरी आहेत. प्रशासनाने कालव्यासाठी अंदाजे १०४ दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी १७ दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन केले आहे. हे नियोजन शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. त्यात प्रशासनाने दोन पाणीपाळ्या दिल्यानंतर तीन पाणीपाळ्या जाहीर केल्या. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी त्या दोन्ही पाणीपाळ्यांवर गहू, ज्वारी, ऊस या पिकांची पेरणी व लागवड केली आहे.

चौकट

विष्णूपुरीचे एकूण लाभक्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. पण ते अर्धवट आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा प्रकल्प म्हणून तो ओळखला जातो. लाभक्षेत्रात खडकाळ व उंचीवर जमीन असल्यामुळे गहू व ज्वारी या पिकांसाठी ५ पाणीपाळ्या लागतात. पहिल्या पाणीपाळीला ७ दशलक्ष घनमीटर पाणी लागते व नंतरच्या प्रत्येक पाणीपाळीला ५ दशलक्ष घनमीटर पाणी लागते, असे एकूण ५ पाणीपाळ्यांना २७ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. परंतु, प्रशासनाने १७ दशलक्ष घनमीटर पाणी देऊन लाभार्थी शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा १०४ दशलक्ष घनमीटर असताना केवळ १७ दशलक्ष घनमीटर पाणी शेतीसाठी देऊन बाकी पाणी कुठे मुरतेय, यात काही अर्थकारण आहे का? किंवा जलसंपदा विभागाचे नियोजन चुकतेय का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय जल आयोगाने ११ टीएमसी पाणी विष्णूपुरी खोऱ्यांना देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे पाच पाणीपाळ्या देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा होणाऱ्या नुकसानाचा मोबदला द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.