शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मदत वाऱ्यावर, रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

कोरोना महामारीमुळे यंदाही रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

कोरोना महामारीमुळे यंदाही रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार २० एप्रिल रोजी परिवहनमंत्र्यांनी रिक्षाचालकांना अर्थसाहाय्य देण्यासाठी रिक्षा पदाधिकारी व परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्यासंबंधी नियोजन केले होते. मात्र, या घटनेला आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. रिक्षाचालक निधीची प्रतीक्षा करीत आहेत.

चौकट- रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया

१. मागील दोन महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दीड हजार रुपये अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. तीसुद्धा वेळेवर दिली जात नाही. सगळेच अवघड झाले आहे. - मुखीद पठाण, पीरबुऱ्हाणनगर

२. मागील वर्षापासून ऑटोरिक्षा चालकांवर वाईट वेळ आली आहे. आमचे पोट तीन चाकावर आहे. मात्र, तेच बंद आहेत. त्यामुळे आमचे कुटुंब कसे जगवायाचे हा गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. या काळात कोण किती मदत करणार. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी. - माणिक भालेराव, महेबूबनगर.

३. राज्यातील प्रत्येक रिक्षाचालक शासनाच्या अनुदान निधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. दुसरीकडे कर्ज घेतलेल्या रिक्षाचालकांना हप्ते कसे फेडायचे, हा प्रश्न गंभीर वाटत आहे. त्यामुळे शासनाने रिक्षाचालकांसाठी भरीव मदत करावी. - अहेमद बाबा, जिल्हाध्यक्ष, टायगर रिक्षा संघटना, नांदेड.

४. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयभीत वातावरण झाले आहे. बाहेर पडावे तर कोरोनाची भीती, घरात बसावे तर पोटाची काळजी, अशा परिस्थिती जगायचे कसे, याचा मार्ग सापडत नाही. अशा वेळी शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. - रमेश भालेराव. तरोडा खु., नांदेड.