शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

रणरणत्या उन्हात आजपासून शाळांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:15 AM

तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या झळा कायम चार दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशांवर स्थिर पाण्यासाठी भटकंती सुरूच

नांदेड : तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा या दुष्काळी वातावरणात शाळांना प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, या दुष्काळी परिस्थितीत सुरू होणाऱ्या शाळांबाबत जिल्ह्यातील एकाही पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही, हे विशेष!जिल्ह्यात १७ जून रोजी शाळांना सुरुवात होत आहे. जिल्हा परिषदेच्या २ हजार २३९ शाळा तर पहिली ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शाळांची संख्या ३ हजार ७७६ इतकी आहे. या शाळांना १७ जून रोजी प्रारंभ होत आहे. जवळपास १२ लाख विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचणार आहेत. त्यातच पहिलीच्या प्रवेशालाही प्रारंभ होणार आहे. जवळपास १५ दिवस पटनोंदणी चालणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचाही १७ जूनपासून शोध घेतला जाणार आहे. या सर्व बाबी शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी केल्या जाणार असल्या तरीही दुष्काळी परिस्थितीचा मोठा अडसर या सर्व बाबींपुढे राहणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता अद्यापही वाढतच आहे. जिल्ह्यातील टँकरची संख्या १४० वर पोहोचली आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशावर कायम आहे.जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मात्र या मागणीला प्रशासनाकडून अद्याप तरी प्रतिसाद मिळाला नाही. सुट्या वाढविण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र हा निर्णय शासनस्तरावरुन घेणे आवश्यक असल्याचे सांगत जिल्हा परिषदेने अंग काढून घेतले. या सर्व बाबींचा फटका १७ जूनपासून सुरू होणा-या शाळांना बसणार आहे.ग्रामीण भागात अद्यापही महिला-मुले पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. या परिस्थितीत शाळा सुरू होणे अडचणीचे ठरणार आहे. राज्य शासनाने दुष्काळी भागात शाळा-महाविद्यालयांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने टंचाईसदृश्य उपाययोजनेत शाळांनाही टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात टँकरची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये टँकर उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिल्यानंतरही टँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रारी आल्या आहेत. त्यातच आता पाण्याचे स्त्रोतही बंद झाले आहेत. त्यामुळे शाळांना पाणीपुरवठा करायचा कुठून? हा प्रश्नही प्रशासनापुढे उभा टाकला आहे. अशा परिस्थितीत पाणी आणायचे कोठून? हा प्रश्न पुढे आला आहे. विदर्भात पाण्याच्या टंचाईमुळे २६ जूनपासून शाळा सुरू होतात. नांदेड जिल्ह्यात यावर्षी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत ‘ब्र’ ही काढला नाही.आरटीईची दुसरी प्रवेश फेरी आज

  • बालकांचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ३ हजार २४८ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीत १ हजार ६४४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. दुसºया फेरीतील सोडत १७ जून रोजी होणार आहे. दुसºया फेरीत १ हजार ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. याबाबत पालकांना मेसेज दिले जाणार असून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
  • जिल्ह्यातील शाळामध्ये प्रवेश घेणाºया मुलांचे पहिल्याच दिवशी पुष्प देवून स्वागत केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी हे आपआपल्या भागातील शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीRainपाऊसwater shortageपाणीटंचाई