शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

गुरु रविदासांचा संघर्ष विषमतावादी व्यवस्थेविरूद्ध होता - पद्‌माकर बाबरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:17 AM

नांदेड : चौदाव्या शतकात गुरु रविदासांनी सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी भक्तीमार्ग आंदोलनाच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाला सत्य, असत्य ...

नांदेड : चौदाव्या शतकात गुरु रविदासांनी सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी भक्तीमार्ग आंदोलनाच्या माध्यमातून या देशातील बहुजन समाजाला सत्य, असत्य व विज्ञानवाद सांगितला. जात अथवा वर्णव्यवस्था ही निसर्गनिर्मित नसून, मानवनिर्मित आहे, तिचा नायनाट झाला पाहिजे, यासाठी त्यांनी मानवनिर्मित जातीव्यवस्था व जातीव्यवस्थेला बळ देणाऱ्या मानवा-मानवात उच्च-निचतेचा विचार निर्माण करणाऱ्या धर्मग्रंथांना नाकारून जातीअंताची लढाई लढली. मुळात गुरू रविदासांचा संघर्ष हा विषमतावादी व्यवस्थेविरूद्ध होता, असे मत इंजि. पद्‌माकर बाबरे यांनी व्यक्त केले.

कांशी-माया प्रबोधन मंच, नांदेडच्यावतीने आयोजित गुरू रविदास यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीएफचे अध्यक्ष मनोजकुमार वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेम पाटील बोकारे, गजानन पाटनूरकर, संगम वाघमारे टेलर उपस्थित होते.

बाबरे म्हणाले की, आज देशात गुरू रविदासांच्या विचारांची खरी गरज आहे. रविदास कोणत्या जातीत जन्माला आले हे महत्त्वाचे नाही, ते महामानव होते त्यांची जयंती प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांनी साजरी करून एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुरू रविदासांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी बहुजन समाजाला एकत्र करून कांशीरामजी जयंतीपासून विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून मनोजकुमार वाघमारे यांनी गुरू रविदासांचे कार्य सविस्तर सांगून त्यांच्या जीवनकार्याचा इतिहास पाच केडर कॅम्प घेऊन राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवराज कांबळे, उमाजीअण्णा रेड्डी यांनी विचार मांडले.

प्रास्ताविक तुकाराम टोम्पे यांनी केले. सूत्रसंचालन शेख जावेद यांनी केले तर शिवाजी सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दिगंबर वाघमारे, गंगाधर सर्जे, करण बनसोडे, बालाजी टोम्पे, कृष्णा टोम्पे, चांदोजी हराळे, उत्तम टोम्पे आदींनी परिश्रम घेतले.