शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावरील उपचार मोफत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST

जनता दलाचे सोमवारी उपोषण नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच ...

जनता दलाचे सोमवारी उपोषण

नांदेड- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गरीब कुुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनता दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याच मागणीसाठी १० मे रोजी जनता दलाच्यावतीने उपोषणही करण्यात येणार आहे. गरीब कुटुंबांना १० हजार रुपये आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, डॉ. किरण चिद्रावार, मोहमद पठाण, सूर्यकांत वाणी, लक्ष्मण शिंदे, बालाजी आलेवार, अर्चना पारळकर आदींनी केली आहे.

मोफत वैद्यकीय सेवेची मागणी

नांदेड- कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. हे उपचार परवडणारे नसून आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सर्व कोरोना रुग्णावर मोफत उपचार करण्याची मागणी जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात खड्डे

नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे हे खड्डे भरत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी बसस्थानकात नसल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.

वडगाव आरोग्य केंद्रात लसीकरण

नांदेड- तालुक्यातील वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जनजागृती केल्याने लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कसबे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर

नांदेड - शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून लसीकरणदेखील करण्यात येत आहे; परंतु लसीकरणानंतर दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यावतीने १० मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे. शहरातील बाफना ब्रिज रेणुकाई हॉस्पिटलच्या बाजूस असलेल्या सचिन गॅरेज येथे सकाळी ९ ते ४ पर्यंत हे रक्तदान शिबिर करण्यात आले आहे.

पावसामुळे फळबागांचे नुकसान

नांदेड- जिल्ह्यात सध्या अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होत आहे. या वादळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसामुळे आंबा, टरबूज, पपई, खरबूज, केळी आदी फळबागांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.