शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तरुण फळविक्रेत्यांवर काळाचा घाला; तेलंगणातील अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 4:16 PM

तेलंगणात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आॅटोचालक  गंभीर जखमी आहे.

ठळक मुद्देचौघेही तरुण भागीदारीत सफरचंद विक्रीचा व्यवसाय करीत होते.

देगलूर (जि. नांदेड) :  तेलंगणातील नारायणखेड येथील बाजारपेठेत सफरचंद विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आॅटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव  ट्रकने धडक दिली. या अपघातात देगलूर येथील शेख सद्दाम शेख मौलाना  (२८, लाईनगल्ली), शेख सैलानी बाबा शेख महेबूब (२५, भायेगाव रोड), शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन (३०, जियाकॉलनी ) या तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर एका जणाची प्रकृती गंभीर आहे. ही  घटना मंगळवारी कंदरपल्ली चौरस्त्यावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. 

मंगळवारी नारायणखेड येथे आठवडी बाजार असल्याने शेख सद्दाम शेख मौलाना, शेख सैलानी बाबा शेख महेबूब, शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन व आॅटोचालक शेख हबीबवल्ली चाऊस (२८, तेलीगल्ली ) हे देगलूर येथील चारजण आॅटोने (टीएस १६-युसी ११३०) नारायणखेडकडे जात होते. कंदरपल्ली चौरस्त्यावर समोरुन येणाऱ्या ट्रकने (एमएच ३० एबी- ३५८९) दिलेल्या जोरदार धडकेत शेख सदाम शेख मौलाना हा तरुण जागेवरच ठार झाला. गंभीर दोन जखमींना बांसवाडा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी निजामाबादला नेण्यात येत असताना रस्त्यातच सैलानी बाबा शेख महेबूब याचा मृत्यू झाला. तर  शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन नांदेड येथे उपचारासाठी नेताना नरसीजवळ त्याची प्राणज्योत मालवली. 

आॅटोचालक शेख हबीब वली चाऊस याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर निजामाबादच्या शासकीय रुग्णालयात  उपचार सुरू आहे. दरम्यान, अपघाताची घटना घडताच नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव  घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी इतरत्र हलविण्यास मदत केली. याप्रकरणी बिचकुंदा पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुुन्हा नोंद करण्यात आला आहे.

देगलूर शहरावर शोककळातेलंगणात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आॅटोचालक  गंभीर जखमी आहे. हे चौघेही देगलूर येथील तरुण भागीदारीत सफरचंद विक्रीचा व्यवसाय करीत होते. चारही तरुण अविवाहित असून दररोज कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसह देगलूर शहरावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडAccidentअपघातTelanganaतेलंगणा