शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जागतिक जल दिन! ‘जलयुक्त शिवार’मुळे नागपूर जिल्ह्यात वाढला पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:54 IST

राज्य शासनानेही पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्रसाठी ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. जलयुक्त शिवारमुळे पहिल्या दोन वर्षातच नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली आहे, हे विशेष.

ठळक मुद्देसिंचन क्षेत्र वाढले गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी योजनांनाही प्रतिसाद

आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीटंचाई ही तशी जागतिक समस्या. जगभरात त्याबाबत बरीच जनजागृती सुरू आहे. शासनस्तरावरही मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. राज्य शासनानेही पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्रसाठी ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. लोकांचा सहभाग आणि शासनाची भरघोस मदत यातून सुरू असलेले हे अभियान नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. जलयुक्त शिवारमुळे पहिल्या दोन वर्षातच नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत एक ते दीड मीटरने वाढ झाली आहे, हे विशेष.नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर हा परिसर संत्रा बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर संत्रा लावला जातो. परंतु या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खाली आहे. १०० टक्के पाण्याचा उपसा झालेला भाग हा शासकीयदृष्ट्या डार्क झोन म्हणून घोषित केला जातो. या भागातही जवळपास ८० टक्के पाण्याचा उपसा झाला, त्यामुळे हा परिसर सेमी डार्क झोनमध्ये गणल्या जाऊ लागला. या भागात नवीन बोअरवेलवर बंदी घालण्यात आली. साहजिकच या सर्वांचा परिणाम संत्रा उत्पादनावरही झाला. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू लागली. परंतु जलयुक्त शिवारमुळे सध्या येथील परिस्थितीत कमालीची सुधारणा होत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे.डिसेंबर २०१४ मध्ये राज्य शासनाने जलयुक्त शिवारची घोषणा केली. २०१५-१६ मध्ये ३१३ गावांची निवड करण्यात आली. पहिल्याच वर्षी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश गावांतील कामे पूर्ण झाली. २०१६-१७ मध्ये नियोजनपूर्ण १८५ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये एकूण ३०३६ कामे सुरू झाली. यापैकी २९३६ कामे पूर्ण करण्यात आली. या सर्व कामांवर तब्बल ७४ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक १७३२ कामे ही कृषी विभागाने केली. वन विभागाने ३३० कामे, लघु सिंचन(जि.प.)ने २१७ कामे, ग्रामीण पाणी पुरवठ्याने ३९ कामे, भूजल सर्वेक्षणाने १२५ कामे केली. यात ग्राम पंचायतही मागे राहिली नाही. त्यांनी तब्बल ४२० कामे पूर्ण केली. यावर्षी (२०१७-१८) मध्ये २२० गावांचे नियोजन करण्यात आलेले आहे. जलयुक्त शिवारमध्ये नाला खोलीकरण, सरलीकरण, सिमेंट बंधारा, जुना बंधाऱ्याची दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतांमधून गेलेल्या नाले बंधाऱ्यात पाणी वाढले आहे. परिसरातील जवळपासच्या विहिरींमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. यासोबतच शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी या योजनाही जलयुक्त शिवारच्या सोबतीलाच राबविण्यास सुरुवात केली. गाळमुक्त धरणमुळे २०१६-१७ मध्ये ५४ गावांतील ५८ लघु सिंचन तलावातील १ लाख २४ हजार ४१० घनमीटर गाळ काढण्यात आला. तर २०१७-१८ मध्ये १०७ लघु सिंचन तलाव, १५ पाझर तलाव, ३० मामा तलाव अशा एकूण १५२ तलावांमधील तब्बल २८ लाख ६४ हजार ४२० घनमीटर गाळ काढण्यात आला. यासोबतच मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १३३७ आणि सिंचन विहिरी योजनेंतर्गत एकूण ५६७३ मंजूर सिंचन विहिरींपैकी ३५८५ पूर्ण झाल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागपूर जिल्ह्यातील नाल्यांमध्ये, तलावांमध्ये, विहिरींमधील पाण्याचा साठा वाढला आहे.

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुकजलयुक्त शिवारमध्ये नागपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले आहे. काटोल व नरखेडमध्ये राबविलेल्या कामांचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरवसुद्धा करण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणी