शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी हयात, पतीने केलेले दुसरे लग्न निरर्थक

By admin | Updated: August 2, 2015 03:01 IST

पहिल्या लग्नाची पत्नी हयात असताना एका पतीने केलेले दुसरे लग्न कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयाने व्यर्थ व निरर्थक ठरवले.

कौटुंबिक न्यायालयाचा निकालराहुल अवसरे नागपूरपहिल्या लग्नाची पत्नी हयात असताना एका पतीने केलेले दुसरे लग्न कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयाने व्यर्थ व निरर्थक ठरवले. याचिकाकर्ती महिला वकीलपेठ भागातील रहिवासी असून ती मेयो इस्पितळात परिचारिका आहे. तिने याचिकेत भानखेडा भागात राहणाऱ्या आपल्या पतीला, संगीता नावाच्या एका महिलेला आणि उंटखाना भागात राहणाऱ्या देवानंद नावाच्या इसमाला प्रतिवादी केले होते. कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या कलम ७ (ए)(बी) अंतर्गत तिने दुसरे लग्न व्यर्थ व निरर्थक जाहीर करण्यात यावे, १७ फेब्रुवारी २०१० रोजीचे विवाह प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत केली होती. याचिकाकर्त्या महिलेनुसार तिचे लग्न प्रतिवादी एकसोबत हिंदू रीतीरिवाजाने २८ मे १९९९ रोजी हनुमाननगर येथे झाले होते. तिला जुळ्या मुली आहेत. ३ जुलै २०१२ रोजी संगीता नावाच्या महिलेने तिला मेयो इस्पितळातील तिच्या कार्यालयात एक पत्र पाठविले होते. तुझ्या पतीसोबत माझे १७ फेब्रुवारी २०१० रोजी बुद्धनगर येथील चंद्रमणी पाली बुद्धविहार संस्थेत लग्न झाले आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. पतीने आपणास घटस्फोट न देता केलेले हे लग्न बेकायदेशीर आणि बोगस आहे, चंद्रमणी पाली बुद्धविहार संस्थेने दिलेल्या विवाह प्रमाणपत्राला कायद्यात किंमत नाही, ते निरर्थक आहे. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक दोन संगीता हिला हे बेकायदेशीर प्रमाणपत्र वापरण्यावर तसेच प्रतिवादी क्रमांक एकच्या नावाचा पती म्हणून वापर करण्यावर कायमचा मनाईहुकूम देण्यात यावा, असे याचिकाकर्तीने याचिकेत नमूद केले होते. याचिकाकर्त्या महिलेच्या पतीने न्यायालयात लेखी उत्तर दाखल केले. लग्न केल्याचा दावा करणारी संगीता ही न्यायालयात हजर झाली. मात्र तिने उत्तरच दाखल केले नाही. देवानंद नावाचा इसमही न्यायालयात हजर झाला नाही. प्रतिवादी पतीने आपला संगीतासोबत कधीही विवाह झाला नाही. विवाह प्रमाणपत्र बनावट व बोगस आहे. याचिकाकर्तीसोबतच आपला विवाह झालेला आहे आणि आपणास दोन मुली आहेत, असेही त्याने उत्तरात स्पष्ट केले. न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करीत याचिका मंजूर केली आणि प्रतिवादी क्रमांक एक आणि संगीतामधील विवाह व्यर्थ व निरर्थक आहे, असे जाहीर केले. विवाह प्रमाणपत्रही बेकायदेशीर ठरवले.