शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण कधी होणार ? आठवडा उलटूनही सर्वेक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 23:10 IST

जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ९ हजार ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.

ठळक मुद्दे९११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ९ हजार ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. परंतु या अतिवृष्टीला आठवडा लोटूनही नुकसानीचे सर्वेक्षण मात्र झालेले नाही. त्यामुळे सर्वेक्षण कधी होणार आणि नुकसाान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२१ व २२ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे २२ जुलैला जिल्ह्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाला. कामठी, सावनेर, कळमेश्वर, रामटेक व हिंगणा तालुक्यातील २१९ गाव बाधित झाले. पावसामुळे ९ हजार ११५.१२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर जवळपास ८ हजारावर शेतकरी बाधित झाले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सर्वाधिक ५ हजार हेक्टरमधील कापूस पिकांचे नुकसान झाले तर त्या खालोखाल तूर, सोयाबीन, धान, मका, संत्रा, मोसंबी व आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार अद्यापही जिल्ह्याच्या अतिवृष्टी झालेल्या तालुक्यातील गावांमध्ये कृषी व महसूल विभागातील कर्मचारी नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण करीत आहेत. परिणामी प्रशासनाकडून अद्यापही त्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवालच तयार झाला नाही. त्यामुळे प्रशासन किती गांभीर्याने हे सर्वेक्षण करत आहे, हे दिसून येते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस