शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गहू झाला आडवा, कापलेला हरभरा पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST

उमरेड : खरीपात सोयाबीन आणि कपाशीने शेतकऱ्यांना धोका दिला. आता रबी हंगामात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना रडवीत आहे. रबी हंगामात ...

उमरेड : खरीपात सोयाबीन आणि कपाशीने शेतकऱ्यांना धोका दिला. आता रबी हंगामात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना रडवीत आहे. रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा अनेकांच्या शेतात डोलत होता. येत्या काही दिवसात पीक हाती येईल आणि कोरोना काळात झालेली आर्थिक दैना थोडी फार दूर होईल. पैसाअडका हातात येईल, या आशेवर शेतकरी असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचा उभा गहू आडवा झाला. ज्वारीचे पिकही झोपले. दुसरीकडे शेतात कापणी करून ठेवलेल्या हरभऱ्यावरही पावसाचे संकट कोसळले. हवामान खात्याच्या अंदाजानंतर दोन दिवसापासून आकाशात काळे ढग दाटून आले असताना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. काही ठिकाणी सुमारे अर्धा तास पावसाने झोडपल्याचाही प्रकार उमरेड तालुक्यात झाला. काही भागात गारांचा पाऊसही पडला. कळमना, सिंगोरी आणि बेला परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस बरसला. उमरेड, मकरधोकडा, उदासा, ब्राह्मणी, आंबोली, सेव, गावसूत, आपतूर, बोथली, किन्हाळा, तीरखुरा, सावंगी, सिर्सी, मानोरी, कळमना, हिवरा-हिवरी, चनोडा, सुकळी, नांदरा, शेडेश्वर आदी गाव परिसरात विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडला. काही मिनिटाच्या या पावसाने पिकांचे नुकसान केले. यामुळे पिकांच्या उत्पादन आणि चकाकीवर परिणाम होणार असल्याची कैफियत विलास दरणे, चंद्रशेखर ठवकर, नागसेन निकोसे, अश्विन उके, हन्नू शिंदे, पुरुषोत्तम बोबडे, कुणाल मुळे, रोशन सेलोटे, राजकुमार बेले, राजकुमार राऊत, श्रीकांत चिकनकर, प्रणय धोंगडे, राहुल तागडे, सचिन भाकरे, चेतन बकाल आदी शेतकऱ्यांनी मांडली. येत्या आठवड्यात गहू आणि ज्वारीचे पीक कापणीला येणार होते. हरभरा कापणीलाही चांगलाच वेग आला होता. अखेरच्या टप्प्यात हरभऱ्याची कापणी सुरू असतानाच निसर्गाने दणका दिला. तातडीने सर्वेक्षण करण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.