शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस चौक्यांचे बंद दरवाजे काय कामाचे? गुन्हेगारी नियंत्रणात येणार कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2023 08:00 IST

Nagpur News शहरातील काही पोलिस चौक्या नावालाच असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. काही पोलिस चौक्यांचे दरवाजे बहुतांश वेळा बंदच दिसतात. त्यामुळे नागरिकांनी किरकोळ तक्रारी किंवा समस्यांसाठी प्रत्येक वेळी थेट पोलिस ठाणे गाठावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

योगेश पांडे

नागपूर : नागपुरातील गुन्हेगारी घटनांची चर्चा राज्यभर होते. राजकीय विरोधकांकडून नागपूर ‘क्राईम कॅपिटल’ झाल्याचेदेखील आरोप करण्यात येतात. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी दिसले की गुन्हेगारांमध्ये वचक बसावा, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिस चौक्यांची निर्मिती करून तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शहरातील काही पोलिस चौक्या नावालाच असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. काही पोलिस चौक्यांचे दरवाजे बहुतांश वेळा बंदच दिसतात. त्यामुळे नागरिकांनी किरकोळ तक्रारी किंवा समस्यांसाठी प्रत्येक वेळी थेट पोलिस ठाणे गाठावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिस ठाण्याचे अंतर जास्त असल्याने नागरिकांना त्यांच्या किरकोळ तक्रारी या चौकीत जाऊन मांडता याव्यात, त्यांना तत्काळ मदत मिळावी, हादेखील पोलिस चौक्यांच्या स्थापनेमागील हेतू आहे. नागपुरात २५ हून अधिक पोलिस चौक्या आहेत. यातील बहुतेक पोलिस चौक्या या बंदोबस्त ठेवण्यासाठीच प्रासंगिक वापरल्या जातात. शहरात होणाऱ्या चोऱ्या, लूटमारीसारख्या घटनांच्या तक्रारी देण्यासाठी चौक्या सुरू कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. काही पोलिस चौक्यांना बहुतांश वेळा कुलूप असते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

२४ तास चौकी उघडी असावी

नागरिकांना सुरक्षिततेची भावना कायम राहावी. यासाठी पोलिस चौकी असणे गरजेचे आहे; मात्र शहरात चौकीच कार्यरत नसल्याने रात्री-अपरात्री काही झाल्यास पोलिस चौकी २४ तास उघडी असावी, अशी अपेक्षा आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.

पोलिस ठाण्यांसोबत चौक्यादेखील वाढवाव्या

पूर्व नागपुरात काही वस्त्या गुन्हेगारी कारवायांसाठी कुख्यात आहेत. पूर्व नागपूरचा विस्तार पाहता आणखी दोन ते तीन पोलिस ठाणे व पोलिस चौक्या वाढविण्याची गरज असल्याची मागणी तेथील आमदार कृष्णा खोपडे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

या चौक्या नावालाच

‘लोकमत’च्या चमूने शहरातील काही पोलिस चौक्यांची पाहणी केली. यशवंत स्टेडियमजवळील पोलिस चौकीला भर सायंकाळी कुलूप होते. ही पोलिस चौकी बहुतांश वेळा बंदच असल्याची माहिती तेथील दुकानदारांनी दिली. तर महाल येथील चिटणवीसपुरा येथील पोलिस चौकीलादेखील कुलूप होते. हा भाग सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. मात्र तरीदेखील कुणीच नसल्याचे दिसून आले.

दोन महिन्यांपासून चौकीला कुलूपच

नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वतंत्रनगर येथे पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र या पोलिस चौकीला कुलूपच होते. मागील दोन महिन्यांपासून येथे कुणीच कर्मचारी भटकले नाही व चौकीला कुलूपच असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

चौकीत सुविधांचा अभाव

शहरातील अनेक भागातील पोलिस चौकी सुरू असतात. मात्र या चौकींची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना कसे तरी तेथे बसावे लागते. काही ठिकाणी पावसाळ्यात मोठा त्रास होतो. ही दुरवस्था दूर करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस प्रयत्नांची आवश्यकता आहे.

टॅग्स :Policeपोलिस