शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल भक्तांची मांदियाळी

By admin | Updated: July 28, 2015 04:18 IST

आषाढी एकादशी पर्वानिमित्त ठिकठिकाणी दिंडी व रथयात्रेचे आयोजन करून भाविकांनी विठुरायाचा गजर केला.

आषाढी एकादशी : धापेवाडा व रामटेकमध्ये विठुरायाच्या नामाचा गजरनागपूर : आषाढी एकादशी पर्वानिमित्त ठिकठिकाणी दिंडी व रथयात्रेचे आयोजन करून भाविकांनी विठुरायाचा गजर केला. कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आषाढी उत्सवास सुरुवात झाली तसेच रामटेकमध्ये रथयात्रेचे जल्लोषात आयोजन करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात विठ्ठल भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या उत्सवानिमित्त काटोल, कामठी येथील मंदिरात दिंडी व पूजन-आरती कार्यक्रमाचे आयोजन पार पडले.कळमेश्वरविदर्भाचे पंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी उसळली. पंढरपूरप्रमाणे येथील उत्सवास महत्त्व असल्याने अनेक भाविक येथे येतात. सोमवारी पहाटे ५ वाजता विठ्ठल-रूख्माईची पूजन, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिराचे पट भाविकांसाठी खुले करण्यात आले. दुपारी २ वाजता पांडुरंग बारापात्रे महाराजांचे कीर्तन पार पडले. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.रामटेकशहरातील भगतसिंग वॉर्ड येथील प्राचीन विठ्ठल मंदिरातून सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे सायंकाळी ७.३० वाजता वाजत-गाजत रथयात्रा काढण्यात आली. नगर परिक्रमा करून रथयात्रा रात्री १० वाजताच्या सुमारास मंदिरात परत आली. या रथयात्रेने शहरात विठुरायाच्या नामाचा गजर केला. तसेच आठशे वर्षांची परंपरा असलेल्या स्वामी परमानंद मठातदेखील भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.विठ्ठल मंदिराचे सर्वेसर्वा कृष्णराव मैराळ यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. कृष्णरावांचे आजोबा रामभक्त होते. ते दररोज गडमंदिरात रामाच्या दर्शनाकरिता नित्यनेमाने जात. वार्धक्यामुळे त्यांना मंदिरात जाणे जमेनासे झाले. त्यावेळी रामाने त्यांच्या स्वप्नात येऊन विठ्ठल मंदिर स्थापन करण्यास सांगितले. तो विठ्ठल म्हणजेच मी आहे असा दृष्टांत दिला. या दृष्टांतानुसार विठ्ठल मंदिर उभारण्यात आले. दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिरातून रथयात्रा काढली जाते. कृष्णराव मैराळांच्या निधनानंतर रथयात्रेची प्राचीन परंपरा मोडीत निघणार की काय अशी भीती निर्माण झाली होती, परंतु भगतसिंग वॉर्डाचे माजी नगरसेवक चंद्रशेखर भोयर, दिलीप बिसन, संजय भोयर आदींनी पुढाकार घेऊन रथयात्रा सुरू ठेवली. तीन मजली लाकडी रथ दोरीच्या साह्याने ओढण्यात येतो. रथापुढे घोडा, बँड, टाळ दिंडी आणि भगव्या टोप्या परिधान केलेले भाविक सहभागी होतात. चंद्रशेखर भोयर, दिलीप बिसन, संजय भोयर, आनंदराव नेवरे, खरकसिंग, माकडे गुरुजी, श्रीराम माकडे, अभय ठाणेकर आदींचा रथयात्रेत समावेश होता. भगतसिंग वॉर्डातील विठ्ठल मंदिरातून रथयात्रेला सुरुवात झाली. गांधी चौक, अठरा भुजा गणेश मंदिर, रामतळी अशी परिक्रमा करून रथयात्रा रात्री १० वाजताच्या सुमारास मंदिरात परत आली. रथयात्रा परिक्रमा मार्गावर गृहिणींनी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. गावातील भाविकांनी मनोभावे रथाचे दर्शन घेतले. रथामध्ये विठ्ठल-रुख्माईच्या मूर्ती विराजमान केल्या होत्या.काटोलआषाढी एकादशीनिमित्त शहरात पालखीची पायी दिंडी यात्रा काढण्यात आली. विठ्ठलनामाच्या गजरात निघालेल्या दिंडीने काटोलनगरी दुमदुमली. शहरातील ऐतिहासिक स्वयंभू विराजमान देवी सरस्वती माता मंदिर येथे पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली. ही पायी दिंडी शहरातील मुख्य मार्गाने शनि चौक, चंडिका मंदिर, कृष्ण मंदिर, राऊतपुरा, पंचवटी येथे अनसूया माता मंदिर भ्रमण करून श्रीक्षेत्र अनसूया माता संस्थान पारडसिंगा येथे दिंडीचा समारोप करण्यात आला. दिंडी यात्रेदरम्यान ठिकठिकाणी सडासंर्माजन, रांगोळी व फुलांचा वर्षाव करून दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीतील भाविकांसाठी जागोजागी फराळाचे वाटप करण्यात आले. अनसूया माता सत्संग मंडळातर्फे आयोजित या दिंडीमध्ये विठ्ठल बारई, पुरुषोत्तम भट, युवराज राऊत, धनराज शेरकर, मारोती तांबुस्कर, सुभाष कोठे, विश्वनाथ बागडे, नीलेश नानोटकर आदींचा सहभाग होता. विविध गावातील भजनमंडळ व महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.कामठीस्थानिक दालओळी परिसरातील प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी पर्व उत्साहात साजरे करण्यात आले. सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष फकीरचंद गुरव यांच्या हस्ते पूजन व आरती करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगर परिषद उपाध्यक्ष रणजीत सफेलकर, प्रमोद मेठे, मंदिर कमिटीचे अध्यक्ष भोला तालेवार, संजय गटलेवार, नरेंद्र मूर्ती कायरवार, गिरीधारीलाल रायपरतीवार, नरसिंग तालेवार, बालाजी गंधेवार, राजेश काटरपवार, गीता मंथनवार, रजनी तालेवार, मीना कायरवार, शुभ्रमनी अडेपवार, सीमा मंथापूरवार आदी उपस्थित होते. यावेळी महिला भजन मंडळांनी भजन सादर केले. (प्रतिनिधींकडून)