शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

विजय लिमये : पर्यावरणपूरक अंत्यविधीसाठी मोक्षकाष्ठ दहनाचा पूरक पर्याय; देशात दोन कोटी झाडांवर ‘अंत्यसंस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:03 IST

या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.

ठळक मुद्देअंत्यसंस्काराविषयीची संकल्पनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात गौरवोद्गारही काढलेराज्यात अद्याप फडणवीस सरकारकडून गांभीर्याने याकडे लक्ष दिले गेले नाही ०१५साली संस्थेमार्फत पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविण्यात आला.

नाशिक : भारतात दरवर्षी सुमारे अंदाजे एक कोटी लोक मृत्युमुखी पडतात व त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणा-या लाकडांच्या माध्यमातून जवळपास पंधरा वर्षे वयाची दोन कोटी झाडे कापली जातात. यामुळे एकूणच झाडांच्या कत्तलीनंतर त्यांच्यावरच एकप्रकारे अंत्यसंस्कार होत असल्याचे प्रतिपादन विजय लिमये यांनी केले.निमित्त होते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र आणि विश्वास ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने आयोजित ‘पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार’ विषयावर व्याख्यानाचे. सावरकरनगर परिसरातील विश्वास लॉन्सजवळील क्लब हाउसमध्ये रविवारी (दि.१०) झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी लिमये बोलत होते. नौदलातून सेवानिवृत्तीनंतर लिमये यांनी इको फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार संकल्पनेविषयी जनजागृती अभियान हाती घेतले. व्याख्यानाप्रसंगी बोलताना लिमये म्हणाले, २०१५साली आमच्या संस्थेमार्फत पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबविण्यात आला. यावेळी संस्थेने महिनाभरात १०० मृतदेहांवर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार यशस्वीरीत्या करण्यात आले. यानंतर सदर संकल्पनेविषयी नागपूर महापालिकेपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच संस्थेने नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात राबविलेल्या प्रयोगाविषयी अहवाल महापालिकेला सादर केला. यानंतर महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करत पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार पद्धती राबविण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्काराविषयीची संकल्पनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात गौरवोद्गारही काढले; मात्र राज्यात अद्याप फडणवीस सरकारकडून गांभीर्याने याकडे लक्ष दिले गेले नाही आणि दरवर्षी वनमंत्रालयाकडून राज्यात कोटींच्या कोटी रोपांच्या लागवडीचे उड्डाण करत वृक्षप्रेम दाखविण्याचा प्रयत्न होतो, हा विरोधाभास न पटणारा आहे.

...अशी आहे मोक्षकाष्ठ संकल्पनामोक्षकाष्ठ संकल्पना पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी पूरक ठरणारी असल्याचा दावा लिमये यांनी केला आहे. या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. यासाठी शेतकरी शेतीतला कचºयाची थेट विक्री करू शकतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शेत कचरा यंत्रात टाक ल्यानंतर त्याचे गोलाकार लहान आकाराचे ओंडके तयार होतात; मात्र मागणी नसल्यामुळे अशा प्रकारची कारखाने राज्यात खूप कमी आहेत. नागपूरमध्ये आठ कारखाने कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HinduहिंदूNashikनाशिकenvironmentवातावरण