शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात उठाव नसल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

- गरीब, सामान्यांना फायदा : किरकोळ व्यापाऱ्यांचा भाव कमी करण्यास नकार मोरेश्वर मानापुरे नागपूर : अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून ...

- गरीब, सामान्यांना फायदा : किरकोळ व्यापाऱ्यांचा भाव कमी करण्यास नकार

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून सोयाबीन कच्च्या तेलाची सुरू झालेली आयात आणि विदेशात मंदीचे वातावरण असल्याने देशांतर्गत स्थानिक खाद्यतेल बाजारात सर्वाधिक ८० टक्के विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो जवळपास ११ रुपयांनी उतरले आहे. दर कमी झाल्यानंतरही पूर्वी साठा करून ठेवलेल्या ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी दर कमी करण्यास नकार दिला आहे. नवीन मालाचा साठा असलेले किरकोळ व्यापारी प्रति किलो १२२ ते १२४ रुपये दराने विक्री करीत आहेत. खाद्यतेलाला उठाव कमी असल्याने भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

दरवाढ व साठेबाजांकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा

दिवाळीत सोयाबीन व पाम खाद्यतेल १०० रुपये आणि सूर्यफूल तेल १२० रुपये किलो होते. पण मोठ्या साठेबाजांनी अनेक कारणे सांगून सणाच्या तोंडावर अतोनात भाव वाढविले होते. पंधरा दिवसापूर्वी सोयाबीन तेलाचे दर १३५ रुपयावर पोहोचले होते. या तेलाच्या दरवाढीचा उच्चांक होता. त्यानंतर सामान्यांमध्ये दरवाढीची ओरड सुरू झाली. साठेबाजांवर धाडी मारण्याची आणि भाव दररोज का वाढतात, याची चौकशी करण्याची मागणी ग्राहक संघटनांनी केली होती. पण याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला. त्यामुळे गरीब आणि सामान्यांना महागाईचा सामना करावा लागला होता.

उठाव कमी झाल्यानेच भाव उतरले

आयात वाढल्याने सोयाबीन खाद्यतेलाचे दर उतरल्याचे वक्तव्य व्यापारी संघटना करीत असल्या तरीही स्थानिक बाजारात खाद्यतेलाला उठाव नसल्याने आणि बाजारात मंदी आल्याने खाद्यतेलाचे दर उतरल्याचे कारण काही व्यापाऱ्यांनी दिले. मोठ्या व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेलाचा साठा आहे. गुजरात आणि अन्य राज्यातून नागपुरात पॅकिंगसाठी सोयाबीन तेल मोठ्या प्रमाणात येते. उठाव नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा होत आहे. थोडा फार तोटा सहन करून मोठ्या व्यापाऱ्यांनी तेल विक्रीसाठी बाजारात आणल्याने भाव कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढे आणखी १० रुपयापर्यंत भाव कमी होऊ शकतात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मोठ्या खाद्यतेल कंपन्या लिटरमागे (एक लिटर ९१० ग्रॅम) जास्त नफा कमावून पूर्वीच्या वाढीव भावातच विक्री करीत आहेत. त्याचा फटका सामान्यांना बसत आहे.

नागपूर बाजारपेठ विदर्भात सर्वात मोठी

खाद्यतेलासाठी नागपूर बाजारपेठ विदर्भात सर्वात मोठी समजली जाते. नागपुरातून संपूर्ण जिल्ह्यात दररोज जवळपास १५ हजार टिन (एक टिन १५ किलो) खाद्यतेलाची विक्री होते. यामध्ये सोयाबीन खाद्यतेलाचा सर्वाधिक ८० टक्के वाटा आहे. त्याखालोखाल सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाची विक्री होते. त्यामुळे सणासुदीत साठेबाजांनी संगनमत करून सोयाबीनचे सर्वाधिक १३५ रुपयापर्यंत दर वाढविले. पण आता विक्री कमी होऊ लागल्याने भावात घसरण सुरू झाली आहे.

पाम तेलाचेही भाव उतरले

सोयाबीनसह पाम खाद्यतेलाचे भावही उतरले आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया येथून पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात पाम तेलाचे दर प्रति किलो १० रुपयाने उतरून १२० रुपयावर पोहोचले आहे. या तेलाची सर्वाधिक विक्री हॉटेल्स आणि रेस्टॉरंट तसेच गृहउद्योगात होते.

खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)

खाद्यतेल २१ जाने. ७ फेब्रु.

सोयाबीन १३५ रु. १२४ रु.

पाम १३० रु. १२० रु.

सूर्यफूल १४० रु. १३५ रु.

शेंगदाणा १६० रु. १५६ रु.

मोहरी १४० रु. १३५ रु.

जवस १३० रु. १३० रु.

तीळ १५० रु. १४५ रु.

खोबरेल २४० रु. २४० रु.