शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'व्यवस्थाच शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पाडते' हायकोर्टाने कापूस खरेदी प्रक्रियेवर केली नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:37 IST

Nagpur : कापूस खरेदी दिवाळीपूर्वी सुरू व्हावी आणि कापसाचा चुकारा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सात दिवसात जमा केला जावा, याकरिता ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक (ग्रामीण) श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी कापूस खरेदी प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करून व्यवस्थाच शेतकऱ्यांना स्वतःच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आंदोलन करण्यास भाग पाडते, असे कडक ताशेरे ओढले.

कापूस खरेदी दिवाळीपूर्वी सुरू व्हावी आणि कापसाचा चुकारा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सात दिवसात जमा केला जावा, याकरिता ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक (ग्रामीण) श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने व्यवस्थेच्या उदासीनतेवर भाष्य केले. न्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळाने सर्व कापूस खरेदी केंद्र वेळेत सुरू करणे बंधनकारक आहे. परंतु, महामंडळाने यावर्षीही मनमर्जीने कृती केली.

विदर्भामध्ये २०० केंद्रांची गरज असताना आतापर्यंत केवळ ८९ केंद्रच सुरू केली. न्यायालयाने ही केंद्र पुरेशी नसल्याचे बजावले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे महामंडळाचे आद्य कर्तव्य आहे. असे असताना शेतकरी हितासाठी जनहित याचिका दाखल करावी लागणे शोकांतिका आहे. त्यावरून महामंडळ स्वतःच्या कर्तव्याप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते, असे न्यायालय म्हणाले.

अॅड. पुरुषोत्तम पाटील न्यायालय मित्र

उच्च न्यायालयाने हे प्रकरण प्रभावीपणे हाताळण्यासाठी अनुभवी वकील अॅड. पुरुषोत्तम पाटील यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. तसेच, त्यांना शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची माहिती रेकॉर्डवर आणण्याची सूचना केली.

कापूस केंद्राचे निकष काय?

कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात कोणते निकष आहेत, अशी विचारणा न्यायालयाने महामंडळाला केली व यावर येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

'कपास किसान' अॅप अडचणीचे

महामंडळाने 'कपास किसान' अॅप आणले असून कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी या अॅपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करून ग्रामीण भागातील किती शेतकरी स्मार्ट मोबाइल वापरतात? असा प्रश्न विचारला.

आत्महत्यांसाठी समस्या कारणीभूत

शेतकऱ्यांच्या समस्या आताच्या नाही. ते दीर्घ काळापासून विविध समस्यांना तोंड देत आहेत. त्यातून दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात, असे न्यायालयाने नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : System Forces Farmers to Protest: High Court Expresses Displeasure

Web Summary : The Nagpur High Court criticized the cotton procurement process, stating the system compels farmers to protest. Delays in cotton purchases and payments, despite court orders, highlight the corporation's negligence towards farmers' welfare, potentially contributing to farmer suicides.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcottonकापूसFarmerशेतकरीnagpurनागपूर