शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना शाळेत बोलाविण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST

लोकमत इम्पॅक्ट नागपूर : शासनाने १४ ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. शाळा, महाविद्यालये बंद राहतील, असे ...

लोकमत इम्पॅक्ट

नागपूर : शासनाने १४ ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. शाळा, महाविद्यालये बंद राहतील, असे स्पष्ट निर्देश दिले आहे. तरीसुद्धा मुख्याध्यापक, संस्थाचालक ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर, हजेरी लावण्याच्या नावावर शिक्षकांना शाळेत बोलावून दोन ते पाच तास बसवून ठेवत होते. शाळेत शिक्षकांच्या अनावश्यक उपस्थितीमुळे शिक्षकांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत होते. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारच्या अंकात ‘शाळा बंद, पण शिक्षक शाळेत’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांनी तात्काळ पत्र काढून शिक्षकांना अनावश्यक शाळेत बोलावू नये, असे आदेश दिले आहे.

शिक्षण उपसंचालकांनी विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आणि महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले की, लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी सक्ती करू नये. मात्र आपात्कालीन सेवेसाठी घेण्यात आलेले शिक्षक तसेच परीक्षाविषयक कामकाजातील शिक्षक यांना नियुक्त केलेली कामे करावीच लागेल. परीक्षाविषयक मूल्यमापनाची कामे व ऑनलाईनसंबंधित कामे ही सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करावी. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत कोणत्याही शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये.

शिक्षण उपसंचालकाच्या पत्राचा आधार घेत, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना स्पष्ट बजावले की, शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करू नये.