शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या पुनर्विचार याचिका फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढल्याने, एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक गेला होता. याला सर्वोच्च ...

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढल्याने, एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक गेला होता. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी ओबीसींचे आरक्षण रद्द करीत, या जागांवर फेरनिवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यावर निवडणूक आयोगानेही ओबीसींचे आरक्षण सरसकट रद्द करीत, सर्वच जागांवर फेरनिवडणुकांचे आदेश काढले. यात नागपूर, अकोला, वाशीम, धुळे, नंदूरबार आणि पालघर या जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश आहे. यात नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गातील १६ सदस्यांच्या समावेश होता. राज्य सरकारने या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल केली होती, तसेच राज्यातील १९ जिल्हा परिषद सदस्यांनीही पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित निकाल देताना, या सर्वच याचिका फेटाळून लावल्या, तसेच ४ मार्च रोजीच्या आदेशावर स्थगनादेश देण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

- आरक्षणाची मर्यादा ५० टक्के असल्याने एससी, एसटीचे आरक्षण वगळून, उरलेले २७ टक्के ओबीसींना मिळाले. लोकसंख्येचा विचार केल्यास ५२ टक्के ओबीसी आहेत. ओबीसीचे आरक्षण निश्चित करताना, लोकसंख्येचा मुद्दा विचारात घेतला गेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाद मागणारे राज्य सरकार किंवा राखीव जागा ठरविणारे राज्य निवडणूक आयोग दोहोंनीही बाजू ठरवलीच नसल्याने, या ठिकाणी असफल ठरले आहे. ओबीसीच्या पथ्यावर राज्य सरकारचे हे सर्व अपयश येऊन पडले.

नितीन चौधरी

मुख्य संयोजक, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा.