शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

वन खात्याचे सबलीकरण, आगीवर नियंत्रण अन् वन्यजीवांचे संवर्धन करणार

By दयानंद पाईकराव | Updated: April 10, 2025 16:42 IST

वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती : वन खात्याला जनताभिमुख करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अर्थसंकल्पात वन विभागाला निधी मागण्याची गरज भासु नये यासाठी वन विभागात उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना करून वन खात्याचे सबलीकरण करण्यात येणार असून आगीवर नियंत्रणासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करून वन्यजीवांचे संवर्धन करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.

वन विभागाच्या दोन दिवसीय बैठकीसाठी नागपुरात आल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी सेमिनरी हिल्स येथील हरिसींग सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, वन खात्याला आर्थिक बळ कसे मिळेल याबाबत नोट तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिझनल आणि रिजनल फळांच्या ज्युसमधून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यात कोकणात आंब्याचे, पश्चिम महाराष्ट्रात दाळींब, द्राक्षाचे ज्युस, मराठवाड्यात मोसंबी, विदर्भात संत्र्याचे ज्युस तयार करण्याचा विचार आहे. तसेच वन विभागाच्या ७०० नर्सरीत जांभुळ, फणस, आंबा आदींची झाडे लावण्यात येतील. तसेच कोकणातील सुरंगी फुलांचा गजरा खुप प्रसिद्ध असून सुरंगीची झाडे समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा लावण्यात येतील. पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या सुविधेसाठी प्रत्येक गेटचे सुशोभिकरण, रेस्टॉरंट, शुद्ध पाणी, फाईव्ह स्टार हॉटेल आदींना परवानगी देण्याचा मानस असून वनखाते जनताभिमुख करण्यात येईल. चंद्रपूरमध्ये १० एकर जमिनीवर आधुनिक फर्निचर तयार व्हावे या माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रस्तावासाठी दर महिन्याला १० कोटी रुपये या प्रमाणे ७ महिन्यात ७० कोटी रुपये कॅम्पातून देण्यात येऊन असा प्रकल्प प्रत्येक प्रादेशिक विभागात उभारण्यात येईल. तसेच नाशिक आणि ठाणे येथील वन विकास महामंडळाच्या ६० हजार एकर जागेवर सोलर पार्क तयार करून वीज उत्पादन करण्यात येणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन) विवेक खांडेकर आदी उपस्थित होते.

आगीवर नियंत्रणासाठी अधिकारी देणार विदेशात भेटीवनमंत्री म्हणाले, जंगलाला आग लागणे ही केवळ भारतातच घडणारी घटना नसून अनेक देशात जंगलात आगी लागून हजारो हेक्टर वन आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. परंतु अनेक देशांनी आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविले आहे. भविष्यात वन विभागातील अधिकारी संबंधीत देशांना भेटी देऊन त्यांनी आगीवर कसे नियंत्रण मिळविले याबाबतचे तंत्र आत्मसात करतील. यासोबतच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टर, चॉपर, आग विझविणारे ड्रोन खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाघांना कोअर एरीयात बिझी करणार२००२ मध्ये महाराष्ट्रात वाघांची संघ्या १०३ होती. २०२५ मध्ये राज्यात ४४३ वाघ झाले आहेत. बफर झोनमध्ये अधिक वाघ झाले असून हे वाघ गावात येत असल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. परंतु कोअर झोनमध्ये शाकाहारी प्राण्यांसाठी बोरं, आंबा, फणस अशा शाकाहारी फळांची झाडे लावण्यात येतील. त्यामुळे शाकाहारी प्राणी तिकडे जातील आणि ते मासाहारी प्राण्यांची भूक भागवतील, अशी योजना असून वाघांना कोअर एरीयात बिझी ठेवण्याचा प्रयत्न करणार असून वाघांना एक्स्पोर्ट करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

ठाण्यात शोधली सुर्यतारासाठी जमीनवनमंत्री म्हणाले, आम्ही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ५ मार्च २०२५ रोजी गुजरातच्या जामनगरमध्ये वनतारा या खाजगी प्राणी संग्रहालयाला भेट दिली. तेथे २५० वाघ, २०० बिबट, शहामृग, गेंडे असे एकूण १ लाख ५० हजार वन्यप्राणी आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुर्यतारा प्राणी संग्रहालय सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी ठाणे जिल्ह्यात जागा शोधून अनंत अंबानींना पत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :forest departmentवनविभागGanesh Naikगणेश नाईकwildlifeवन्यजीव