शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपातळीवर ‘नार्को फ्लशआऊट’, १० महिन्यांत ११,७०० आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 08:00 IST

Nagpur News राज्यपातळीवर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या माध्यमातून २०२२ मध्ये १० महिन्यांत ११ हजारांहून अधिक आरोपींना अटक झाली असून, जवळपास तेवढेच गुन्हे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देअंमली पदार्थ सेवन-तस्करीचे अकरा हजार गुन्हे दाखल

योगेश पांडे

नागपूर : मागील काही महिन्यांत राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे काही मोठे गुन्हे उघडकीस आले. अंमली पदार्थांच्या जाळ्याची बाब राज्य शासनाने गंभीरतेने घेतली असून, राज्यपातळीवर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या माध्यमातून नियंत्रणावर भर देण्यात येत आहे. २०२२ मध्ये १० महिन्यांत ११ हजारांहून अधिक आरोपींना अटक झाली असून, जवळपास तेवढेच गुन्हे दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.

महादेव जानकर व इतर सदस्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत ९ हजार ५३० गुन्हे दाखल करण्यात आले, तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या ९ हजार ७०० आरोपींना अटक करण्यात आली, तर अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व त्यांची तस्करी करण्याबाबतच्या प्रकरणांत १ हजार ५३० गुन्हे दाखल झाले व त्यात २ हजार १३ आरोपींना अटक करण्यात आली, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

जिल्हा पातळीवर नार्को समन्वय समिती

राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीस व प्रसारास आळा घालण्यासाठी सर्व पोलिस आयुक्तालयाअंतर्गत स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एटीएसच्या अपर पोलिस महासंचालकांकडे समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय राज्यात अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर नार्को समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांकडून वेळोवेळी अंमली पदार्थांच्या गुन्हे व तस्करीबाबत आढावा घेण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दोनच महिन्यांत चार हजार किलोंचे अंमली पदार्थ जप्त

एनसीबीने जुलै महिन्यात केलेल्या कारवाईत १९० किलो गांजा जप्त केला होता, तर सप्टेंबरमध्ये ३.२ किलो कोकेन जप्त केले होते. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोनच महिन्यांत एनसीने जवळपास ४ हजार १०४ किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

मीरा-भाईंदरमध्येच १० टक्के गुन्हे

राज्यातील विविध भागांमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट सुरू असल्याची बाब समोर आली होती. एकट्या मीरा भाईंदर, वसई-विरार या भागात राज्यातील १० टक्के गुन्हे झाले. अंमली पदार्थांचे सेवन व तस्करीबाबत १ हजार ९६ गुन्हे दाखल झाले, तर १ हजार ३७७ आरोपींना अटक करण्यात आली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस