शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

'राज्य सरकारची मदत तोकडी, पण केंद्र सरकारनेही मदत करायला पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 2:27 PM

'देवेंद्र फडणवीसांना दिवसाढवळ्या स्वप्न पडत आहेत.'

नागपूर:राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. पण, शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजवर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'शेतकऱ्यासाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. मदत तोकडी आहे हे सत्य आहे, मात्र डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने मदत करायला पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी अहे, पण ही तात्काळ केलेली मदत आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा भरीव मदत करण्याच्या सूचना करणार आहोत. पण, केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी मदत करायला पाहिजे, केंद्राने मदत केल्यावर परिस्थिती सुधारेल.

वडेट्टीवारांची नाराजी दूर करणारयावेळी नाना पटोले यांनी विजय वडेट्टीवारांच्या नाराजीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी लवकरच वडेट्टीवारांशी बोलणार आहे. त्यांची जर काही नाराजी असेल तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलेल आणि ओबीसी व भटक्या विमुक्तांना निधी मिळत नसेल तर या समाजासाठी सरकारवर दबाव आणून न्याय मागितला जाईल.

फडणवीसांना दिवसा स्वप्न पडताहेतयावेळी नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. देवेंद्र फडणीस हे माझे मित्र सर्वांना माहिती आहे. पण, त्यांना दिवसा स्वप्न पडतात हे काही बरोबर नाही. त्यांना एकदा पहाटेचं स्वप्न पडलं होतं, पण आता दिवसाच स्वप्न पडण योग्य नाही, असा टोला पटोलेंनी लगावला.

राजनाथ सिंह यांनी देशाच्या सुरक्षेवर लक्ष द्यावं

नाना पटोलेंनी यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही निशाणा साधला. सावरकरांनी 1911 मध्ये पत्र लिहिलं त्याबद्दल त्यांना साठ रुपये पेन्शन मिळत होती आणि महात्मा गांधी 1915 मध्ये भारतात आले. पण त्या काळातला मोदींकडे मोबाईल असेल ते राना सिंग यांना सांगितलं असेल, असा टोला पटोलेंनी लगावला. तसेच, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे काही बोलले तरी देशाने त्यांना सोडून दिलं आहे. मात्र राजनाथ सिंग सारख्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशाप्रकारचे वक्तव्य करुन विषय डायव्हर्ट करण्यापेक्षा संरक्षण मंत्री म्हणून आपल्या जबाबदारीकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, असंही पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूरcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार