शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

'राज्य सरकारची मदत तोकडी, पण केंद्र सरकारनेही मदत करायला पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 14:27 IST

'देवेंद्र फडणवीसांना दिवसाढवळ्या स्वप्न पडत आहेत.'

नागपूर:राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. पण, शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या पॅकेजवर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'शेतकऱ्यासाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. मदत तोकडी आहे हे सत्य आहे, मात्र डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने मदत करायला पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी अहे, पण ही तात्काळ केलेली मदत आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हा भरीव मदत करण्याच्या सूचना करणार आहोत. पण, केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी मदत करायला पाहिजे, केंद्राने मदत केल्यावर परिस्थिती सुधारेल.

वडेट्टीवारांची नाराजी दूर करणारयावेळी नाना पटोले यांनी विजय वडेट्टीवारांच्या नाराजीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी लवकरच वडेट्टीवारांशी बोलणार आहे. त्यांची जर काही नाराजी असेल तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलेल आणि ओबीसी व भटक्या विमुक्तांना निधी मिळत नसेल तर या समाजासाठी सरकारवर दबाव आणून न्याय मागितला जाईल.

फडणवीसांना दिवसा स्वप्न पडताहेतयावेळी नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. देवेंद्र फडणीस हे माझे मित्र सर्वांना माहिती आहे. पण, त्यांना दिवसा स्वप्न पडतात हे काही बरोबर नाही. त्यांना एकदा पहाटेचं स्वप्न पडलं होतं, पण आता दिवसाच स्वप्न पडण योग्य नाही, असा टोला पटोलेंनी लगावला.

राजनाथ सिंह यांनी देशाच्या सुरक्षेवर लक्ष द्यावं

नाना पटोलेंनी यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही निशाणा साधला. सावरकरांनी 1911 मध्ये पत्र लिहिलं त्याबद्दल त्यांना साठ रुपये पेन्शन मिळत होती आणि महात्मा गांधी 1915 मध्ये भारतात आले. पण त्या काळातला मोदींकडे मोबाईल असेल ते राना सिंग यांना सांगितलं असेल, असा टोला पटोलेंनी लगावला. तसेच, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे काही बोलले तरी देशाने त्यांना सोडून दिलं आहे. मात्र राजनाथ सिंग सारख्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशाप्रकारचे वक्तव्य करुन विषय डायव्हर्ट करण्यापेक्षा संरक्षण मंत्री म्हणून आपल्या जबाबदारीकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, असंही पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूरcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार