शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट कार्ड, वर्षभरातच खराब

By admin | Updated: May 16, 2016 03:16 IST

प्रादेशिक परिवहन विभागातून कायमस्वरूपी वाहन परवान्यासाठी आधी ९० रुपये शुल्क आकारले जात होते.

आरटीओ : वाहनधारकांना पडतो भुर्दंडनागपूर : प्रादेशिक परिवहन विभागातून कायमस्वरूपी वाहन परवान्यासाठी आधी ९० रुपये शुल्क आकारले जात होते. ‘स्मार्ट कार्ड’ योजना लागू झाल्यापासून वाहनधारकाला ३१३ रुपये मोजावे लागत आहेत. मात्र वर्षभरातच हे कार्ड खराब होऊन डुप्लिकेट कार्डसाठी पुन्हा एवढेच शुल्क भरण्याचीे वेळ येत असल्याने वाहनधारकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.दलालांना फाटा देण्यासाठी व कामाला गती येण्यासाठी आरटीओ कार्यालयाने आॅक्टोबर २००६ पासून ही योजना सुरू केली. शिकाऊ व पक्का वाहन परवाना तयार करण्याचे काम हैदराबादच्या युनायटेड टेलिकॉम कंपनीला देण्यात आले. कायम परवान्यासाठी लागणाऱ्या ३१३ रुपये शुल्कामधून १६२ रुपये ७० पैसे आरटीओला मिळतात. उर्वरित रक्कमेतून ५० रुपये टपाल खात्याला तर शिल्लक रक्कम या कंपनीला मिळते. सुरुवातीची काही वर्षे या कंपनीने चांगले कार्ड दिले, परंतु गेल्या काही वर्षांपासून कार्डाचा दर्जा खालवला असून वर्षभरातच कार्ड खराब होत असल्याच्या तक्रारी आहेत. यात कार्डवरील ‘प्लास्टीक कव्हर’ निघणे, फोटो व नाव पुसट होणे, कार्डातील चिप खराब होणे आदी तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, परवाना खराब झाल्याच्या कारणावरून काही वाहतूक पोलीस आर्थिक दंड वसूल करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. खराब कार्ड बदलविण्यासाठी आरटीओच्या युटीएल विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांच्याकडून डुप्लिकेट अर्ज करण्याची सूचना केली जाते. यामुळे परत अर्ज भरा, शुल्कासाठी रांगेत लागा आणि नंतर कार्ड मिळण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ येते. वर्षभरात कार्ड खराब होत असेल तर त्याचे शुल्क आकारू नये, अशी मागणीही वाहनधारकांकडून होत आहे.(प्रतिनिधी)कार्डला लॅमिनेशन करू नयेवाहन परवानाच्या स्मार्ट कार्डला लॅमिनेशन करू नये. यामुळे परवाना लवकर खराब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या जागी कागदाचे पॅकेट वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, प्रत्येक परवान्यासोबत संबंधित कंपनी कागदाचे पॅकेट देते, परंतु पोस्ट खाते या पॅकेटमध्ये परवाना टाकण्यास टाळाटाळ करते. यामुळे विना पॅकेट वाहनचालकांना परवाना मिळतो.