शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

धक्कादायक! रस्ते सुरक्षेच्या २९८ कोटीचा प्रभावी उपयोग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:22 PM

राज्यात रोज शेकडो प्राणघातक अपघात होत असताना रस्ते सुरक्षेच्या २९८ कोटी रुपयांवर निधीचा प्रभावी उपयोग करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. या धक्कादायक मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : शासन निर्णयानुसार कृती करण्याची विनंती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात रोज शेकडो प्राणघातक अपघात होत असताना रस्ते सुरक्षेच्या २९८ कोटी रुपयांवर निधीचा प्रभावी उपयोग करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. या धक्कादायक मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.राज्यात महाराष्ट्र मोटर वाहन कर कायदा-१९५८ मधील कलम ३-बी अनुसार रस्ते सुरक्षा सेस गोळा केला जातो. याचिकाकर्त्याला माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, २०१६-१७ ते ३० एप्रिल २०१९ पर्यंत एकूण २९८ कोटी २४ लाख ९९ हजार रुपये रस्ते सुरक्षा सेस गोळा करण्यात आला. परंतु, या रकमेतून वाहतूक पोलीस व परिवहन अधिकाऱ्यांना आधुनिक सुरक्षा उपकरणे खरेदी करून देण्यासंदर्भात अद्याप धोरण निश्चित करण्यात आले नाही. त्यामुळे रस्ते सुरक्षा सेस गोळा करण्याच्या उद्देशाची पायमल्ली झाली आहे.१ सप्टेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही रक्कम अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी मार्ग सुरक्षा कक्ष स्थापन करणे, इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टम विकसित करणे व त्याचा उपयोग वाढवणे, महामार्गांवर स्पीड गन व ब्रिथ अनालायजर्ससह विशेष भरारी पथके नियुक्त करणे, वाहतूक पोलीस व परिवहन अधिकाऱ्यांना सुरक्षा व पुराव्यांकरिता बॉडी वेयरिंग कॅमेरे प्रदान करणे, राज्यातील अपघातप्रवण स्थळांचा शोध घेणे, आवश्यक तेथे रेल्वे ओव्हर व अंडर ब्रिज बांधणे, गतिरोधक बांधणे, जनजागृतीसाठी विविध माध्यमातून रस्ते सुरक्षा कार्यक्रम राबविणे इत्यादीकरिता खर्च करणे आवश्यक आहे. निधी व्यवस्थापनासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. असे असले तरी राज्य सरकार निधीचा योग्य पद्धतीने उपयोग करण्यात अपयशी ठरत आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.उत्तर सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देशया प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव, परिवहन आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर व ग्रामीण) व केंद्रीय मार्ग परिवहन व महामार्ग विभागाचे सचिव यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. हरनिश गढिया यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयroad safetyरस्ते सुरक्षा