शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या योग्य मागण्यांची केंद्राने पूर्तता करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना अनेक जण त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना अनेक जण त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंदोलनात काही देशविघातक तत्त्वदेखील शिरले आहेत. शेतकऱ्यांना यातून काय मिळेल यावर विचार व्हायला हवा. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या योग्य आहेत त्याची केंद्राने पूर्तता करावी, अशी भूमिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनी मांडली. २५ व २६ डिसेंबर रोजी नागपुरात ‘अभाविप’च्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच अधिवेशन व्हर्च्युअल माध्यमातून करण्यात येत असून यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत बुधवारी त्या बोलत होत्या.

रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्मृतिमंदिर रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी ३ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अधिवेशनामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे ८० पदाधिकारी प्रत्यक्ष सहभागी होणार असून, देशभरातील ४००० ठिकाणांवर स्क्रीनच्या माध्यमातून दीड लाखाहून अधिक कार्यकर्ते ‘व्हर्च्युअल’ माध्यमातून सहभागी होतील, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये चार प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी, राष्ट्रीय स्थिती, समृद्ध भारताची ओळख आणि कोरोना व भारत या प्रस्तावांवर चर्चा होईल. अधिवेशनामध्ये सहभागी होणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्व नियमांचे पालन करूनच अधिवेशन घेतले जाणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय मंत्री हर्ष नारायण, माध्यम संयोजक राहुल चौधरी, विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे उपस्थित होते.

शिष्यवृत्तीसाठी सरकारला जाब विचारणार

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्तीचा वाटा ६०-४० करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षात केंद्राकडून केवळ १० टक्के निधी देण्यात येत आहे. सरकार कुठल्याची राजकीय पक्ष आणि विचारधारेचे असो, जर त्यांच्याद्वारे शिष्यवृत्ती कमी केल्या जाणार असेल तर आमचा विरोध राहणार आहे. त्याबाबत सरकारला जाब विचारण्यात येईल, असे त्रिपाठी यांनी सांगितले.