शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी माफीवीर नाही तर लढणारे नेते - नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 11:48 IST

कमाल चौकातील सभेत ‘डरो मत’चे आवाहन

नागपूर :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी यांच्या भ्रष्टाचाराविरोधात संसदेत आवाज उठवताच कट रचून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. मात्र, त्यानंतरही राहुल गांधींनी माफी मागून माघार घेतली नाही. ते माफीवीर नाहीत, तर लढणारे नेते आहेत. संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे ‘डरो मत’चा नारा देत राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री नितीन राऊत यांनी केले.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री उत्तर नागपुरातील कमाल चौकात ‘डरो मत’ जाहीर सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी होते. माजी मंत्री नितीन राऊत, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जम्मू आनंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, भीम पँथरचे तारिक शेख, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी गीतेंद्रसिंह दर्शन, उद्धव ठाकरे गटाचे प्रमोद मानमोडे, रिपाइं (से.)चे दिनेश अंडरसहारे, बंडोपंत टेंभूर्णे, मनोज बनसोडे, महेंद्र भांगे आदी उपस्थित होते. या सभेत उपस्थित सर्वच नेत्यांनी केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असल्याची टीका करीत लोकशाही धोक्यात आल्याचे सांगितले.

यावेळी राऊत म्हणाले की, देशाची संसद, न्यायपालिका व प्रशासन ज्या पद्धतीने काम करीत आहे, ते पाहता भविष्यात संविधान बदलण्याचा धोका दिसतो. राहुल गांधी यांनी नफरत छोडो म्हणत ४ हजार किलोमीटर पायी चालत ‘भारत जोडो’चा संदेश दिला. त्यांचा तुम्ही सूडबुद्धीने बदला घेत आहात. पण, आम्ही घाबरणार नाही. जमिनीवर लढाई लढून तुमचा सामना करू, असा इशारा राऊत यांनी दिला.

सतीश चतुर्वेदी म्हणाले की, काँग्रेसने ५५ वर्षे सरकार चालविले; पण कधी विरोधकांना वेठीस धरले नाही. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे पंतप्रधान असताना विरोधकांची टीका सहन करायचे. पण, कुणालाही संसदेबाहेर काढले नाही. आता तर ज्या राज्यात निवडणुका असतात, तेथे विरोधकांच्या घरी आधी ईडी, सीबीआय व आयटी पोहोचते. उघड दडपशाही सुरू आहे. कुणाल राऊत यांनी कोरोना काळात पीएम केअर फंडाच्या नावाखाली जमा केलेला पैसा २० हजार कोटींच्या रूपात अदानीला दिला का, असा सवाल केला.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Rautनितीन राऊतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा