शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रबी पीकही संकटात; ट्रान्सफॉर्मरची समस्या

By admin | Updated: November 4, 2014 00:59 IST

तालुक्यातील लोहारा येथे ट्रान्सफॉर्मरची समस्या काही महिन्यापासून ‘जैसे थे’ असल्यान रबी पीकही संकटात सापडले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे

लोहारा येथील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशाराउमरेड : तालुक्यातील लोहारा येथे ट्रान्सफॉर्मरची समस्या काही महिन्यापासून ‘जैसे थे’ असल्यान रबी पीकही संकटात सापडले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली असून अद्याप वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मदतीला धावली नाही. लोहारा येथील मोहन म्हैसकर यांच्या शेतात लावण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर कुजलेल्या अवस्थेत आहे. सर्व्हिस वायरचे इन्शुलेशनही निघालेले आहे. या ट्रान्सफॉर्मरची ग्रीपही तुटलेली आहे. वेळोवेळी पंप बद पडत असल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ट्रान्सफॉर्मरवरून फेज टाकताना अथवा अन्य कामे करताना मोठा धोका होण्याचीही संभावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गावात ज्या ट्रान्सफॉर्मरवरून वीज वितरित करण्यात येत असते त्यावरही अतिरिक्त भार आहे. यामुळे वारंवार वीज ट्रिप होण्याची समस्या नेहमीचीच झाली आहे. यामुळे गावात पाणी समस्याही निर्माण झाली आहे. पाणीपुरवठाच योग्यरीत्या होत नसल्याने गावकऱ्यांना नाईलाजाने पाण्यासाठी सुमारे एक किलोमीटरची पायपीट करावी लागते.वाघाची दहशतशेतकऱ्यांना पाण्यासाठी फरफट सोसावी लागत असून परिसर जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे याठिकाणी वाघाचीही दहशत आहे. कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी वन विभागानेही सतर्कतेने कार्य पार पाडावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.साहित्य अपुरेपाच एकर ओलिताला महिना लागत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांच्या आहेत. तर दुसरीकडे ट्रान्सफॉर्मर वा अन्य कामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाणवा आहे. साध्या ग्रीपसाठी चार चकरा माराव्या लागल्या. गावात केबल वायर १५ दिवसापासून पडून आहे. वायरसाठीही अनेकदा कार्यालयाचा उंबरठा झिजवावा लागला असल्याचीही कैफीयत शेतकऱ्यांनी मांडली. (प्रतिनिधी)आंदोलन करणारखरीप हंगामात सोयाबीन पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. कापूस थोड्याफार आशा पल्लवित करीत आहे. तर दुसरीकडे रबी पिकांच्या नियोजनाची युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. अशावेळी पाणी असूनही वीज अजबगजब धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. वीज भारनियमनाशिवाय तासन्तास वीज बंद ठेवण्यात येत असल्याने असंख्य शेतकऱ्यांना रात्रीला पिकांना पाणी द्यायला जावे लागते. वेळीच वीज कंपनीने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा सुधाकर कळसकर, राजू कळसकर, ज्ञानेश्वर कोरडे, हरिनारायण देशमुख, बाळु बरडे, अरविंद शेरकी, आनंद कळसकर, राजू सवाईमूल, वर्षा मेश्राम, विलास खारकर आदींनी दिला आहे.