शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
4
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
5
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
6
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
7
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
8
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
9
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
10
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
11
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
12
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
13
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
14
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
15
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
16
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
17
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
18
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
19
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
20
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना कोरोनाची धास्ती नाही; किराणा दुकानात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लावलेल्या कडक लॉकडाऊनने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले ...

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लावलेल्या कडक लॉकडाऊनने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता मॉलही बंद झाले आहेत, पुढे किराणा दुकानेही बंद होण्याच्या भीतीने लोकांनी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी किराणा दुकानात सामानाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बाजारात चित्र होते. किराणा दुकानातून कोरोना पसरत नाही का, असा सवाल करीत अन्य दुकानदारांनी, कोरोनाचा संसर्ग वाढविणारी किराणा दुकाने बंद करण्याची मागणी केली आहे.

गेल्यावर्षीही केंद्र सरकारने लॉकडाऊन लावले, तेव्हाही लोकांची गर्दी झाल्याने किराणा दुकाने रात्रीपर्यंत सुरू असल्याचा अनुभव सर्वांनाच आला होता. तेव्हा एरवीपेक्षा २० ते ३० टक्के जास्त गर्दी झाली होती. धान्यासह किराणा वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केल्या होत्या. तेव्हा गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांना बोलवावे लागले होते.

एप्रिल महिन्यात वर्षभरासाठी लागणाऱ्या डाळी, तांदूळ, मसाले तयार करण्याची पारंपरिक पद्धत आहे. मात्र ५ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना ही खरेदीच करता आली नव्हती. नागरिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी असल्याने घराजवळ सामान उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांनी आता वाजवीपेक्षा जास्त किमतीत माल विकणे सुरू केले आहे. वाढत्या दराने सामानाची खरेदी करण्यापेक्षा दोन-तीन महिन्यांचे सामान आगाऊ खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे. इतवारी मार्केटमधील किराणा दुकानात घाऊक दराने किराणा सामान मिळत असल्याने मोठ्या खरेदीसाठी नागपूरकर येथे नेहमीच गर्दी करतात. मात्र बुधवारीच दुकानात अलोट गर्दी उसळली होती. यामुळे सुरक्षित अंतर, मास्क यासारख्या नियमांना नागरिकांकडून हरताळ फासण्यात आला.