शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदेश २५ टक्क्यांचे, बदल्या ५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST

सुदाम राखडे लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात ...

सुदाम राखडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात मात्र ५० टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या प्रक्रियेत शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेपही काही तलाठ्यांनी केला आहे. माेठ्या गावांमधील तलाठ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

कामठी तालुक्यातील एकूण ७८ गावे २४ पटवारी हलक्यात विभागण्यात आली आहेत. तालुक्याला एकूण २४ तलाठ्यांची आवश्यकता असताना २२ तलाठी कार्यरत असून, दाेन पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. राज्य शासनाने महसूल विभागातील २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले हाेते. त्याअनुषंगाने कामठी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात तालुक्यातील २५ तलाठ्यांच्या बदल्या हाेणे अपेक्षित असताना त्या ५० टक्के करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

बदली करण्यात आलेल्या तलाठ्यांना १ ऑगस्टपासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या बदली प्रक्रियेत शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेप जाणकार व्यक्तींसह काही तलाठ्यांनी खासगीत केला असून, तलाठ्यांअभावी कामे खाेळंबली असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील तीन गावांमधील तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात न असल्याने १५ दिवसांपासून कामे खाेळंबली आहेत, अशी माहिती या गावांमधील शेतकऱ्यांनी दिली. तलाठ्यांनी वेळीच नियुक्त न केल्यास आंदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

...

१२ गावात नियुक्ती, तीन गावांचे काय?

बदली प्रक्रियेतील घाेळ चव्हाट्यावर येताच, जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला. त्यांच्या आदेशान्वये कामठी तालुक्यातील १२ तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येरखेडा, आजनी व साेनेगाव (राजा) ही तालुक्यातील माेठी गावे आहेत. या गावांमध्ये अद्यापही तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. ती कधी केली जाणार, असा प्रश्नही या गावांमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.