शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त गडचिरोलीत केवळ ८ हजार ३२९ किमीचेच रस्ते

By admin | Updated: July 4, 2014 01:07 IST

या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला

बीआरओ गेले : रस्त्यांची कामे नक्षलवाद्यांमुळेही रखडलीगडचिरोली : या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहत असल्याने दुर्गम भागात रस्ते विकासाचे काम करणे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांसाठीही अडचणीचे ठरत आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. त्याच वेळी जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचाही उदय झाला. नक्षलवाद्यांची पाळेमुळे अल्पावधीतच भक्कमपणे रोवल्या गेली. त्यांनी विकासाला कायम विरोध केला आहे. रस्ते, पूल, मोबाईल टॉवर उभारणीच्या कामालाही नक्षलवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८३२९.७५ किमी लांबीचेच रस्ते होऊ शकले. यामध्ये ५० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग, १३०५.१५ किमी लांबीचा राज्य महामार्ग, ९२९.४८ किमी लांबीचा मोठा जिल्हा मार्ग, १३५२.९९ किमी लांबीचे अन्य जिल्हा मार्ग व ४६९२.१२ किमी लांबीचे व्हिलेज रस्ते पूर्ण करण्यात आले. जिल्ह्याच्या आदिवासीबहुल भागात १४१०७ चौ.किमी, गैर आदिवासीबहुल भागात १३२७.०० चौ. किमी तर जंगलव्याप्त भागात १३२०० चौ. किमी लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आले. रस्ते उभारण्यासाठी १९८५ नंतर सीमासडक संघटन (बीआरओ)ला आणण्यात आले होते. त्यांनी एटापल्ली, भामरागड आदी भागात रस्ते व पूल उभारणीचे काम केले. भामरागड तालुक्यात पामुलगौतम नदीवर धोडराजवळील पूल तर एटापल्ली येथे बांडे नदीवर मोठा पूल उभारला. याशिवाय रस्त्यांचीही अनेक कामे पूर्ण केली. २०१२ मध्ये जिल्ह्यातून बीआरओने आपला गाशा गुंडाळला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम सोपविण्यात आले. २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी अनेक बांधकाम व्यावसायिकांची हत्या केली त्यामुळे रस्ते विकासाच्या कामाची गती मंदाविली. आजही जवळजवळ १५ ते २० कामे बंद पडून आहेत. अनेक कामांना कंत्राटदार मिळेनासे झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून कंत्राटदारांची वाहने जाळल्याच्याही घटना गेल्या ५ वर्षांत वाढल्या आहेत. या घटनांमध्ये सुमारे ४ कोटी रूपयाची हानी झालेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)