शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एक राष्ट्र, एक अभ्यासक्रम, एक परीक्षा व्हावी - प्रो. बोंद्रे

By admin | Updated: June 18, 2016 02:26 IST

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विविध प्रवेश परीक्षांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनीअरिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा द्यावी लागते.

नागपूर : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विविध प्रवेश परीक्षांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनीअरिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा द्यावी लागते. त्यांच्याजवळ कुठलीच चॉईस नसते. त्यामुळे त्यांच्यावर आणि पालकांवर प्रचंड मानसिक आणि आर्थिक दबाव येतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी एक राष्ट्र, एक अभ्यासक्रम आणि एक परीक्षा ही संकल्लना राबवावी, असे प्रतिपादन प्रो. रजनीकांत बोंद्रे यांनी केले. प्रो. रजनीकांत बोंद्रे स्नेहा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित एका कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन करताना ही संकल्पना मांडली. प्रो. बोंद्रे हे शैक्षणिक क्षेत्रात मागील २६ वर्षांपासून कार्य करीत असून, त्यांच्या संकल्पनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यांचे या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन एज्युकेशन फिल्डने गौरविण्यात आले आहे. प्रो. बोंद्रे म्हणाले, जेव्हा विज्ञान आणि गणिताची संकल्पना सारखी असते, तर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आणि मूल्यमापन कशाला हवे. विविध प्रवेश परीक्षांमध्ये योग्य स्पर्धा राहत नाही. काही परीक्षात निगेटिव्ह मार्किंग असते तर काही परीक्षात राहत नाही. राज्य आणि केंद्र शासन वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये परीक्षा घेते. जे विद्यार्थी शहरी भागात राहतात ते या परीक्षेसाठी तयार असतात. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धेतून बाहेर पडतात. एनसीईआरटी सिलॅबस आणि पुस्तके देशातील सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आले पाहिजेत. एनसीईआरटीनुसार देशात एक राष्ट्र, एक अभ्यासक्रम आणि एक परीक्षा घेण्यात यावी. मेडिकल आणि इंजिनीअरिंग महाविद्यालयातील प्रवेश या परीक्षेच्या आधारे देण्यात यावा. ही पद्धत सर्वांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टानेही विविध प्रवेश परीक्षा बंद करण्याचे आदेश दिले होते. मेडिकलच्या प्रवेश परीक्षा नीटच्या आधारे करण्यात यावी, असे सांगितले होते. या संकल्पनेचा प्रचार- प्रसार प्रो. बोंद्रे अनेक वर्षांपासून करीत असून, ते लवकरच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी भेटून ही संकल्पना पटवून देणार आहेत. (वा.प्र.)