शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हा परिषदेत नामप्र प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हा परिषदेत नामप्र प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यासंदर्भात ९ मार्चपूर्वी सदस्यांना कळवावे व त्याचा अहवाल आयोगाला पाठवावा, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित केले आहे. त्याचबरोबर आयोगाने १६ रिक्त जागांवर निवडणुकीचा स्वतंत्र कार्यक्रम लवकरच देण्यात येईल असेही स्पष्ट केले आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आरक्षणाची टक्केवारी ५० वर गेली होती. यासंदर्भात दाखल याचिकांवर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण कायम ठेवून ओबीसींचे आरक्षण ५० टक्क्यांमध्ये बसवावे असे राज्य सरकारला आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यावर निवडून आलेल्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. शुक्रवारी आयोगाने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सूचित केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षांसह राष्ट्रवादी व भाजपाच्या गटनेत्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन केली. सुनील केदार यांचे खंदे समर्थक मनोहर कुंभारे यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा दिली. या निर्णयामुळे काँग्रेसेचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसच्या ७ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. भाजप जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसला. अनिल निधान यांची विरोधीपक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यांना सुद्धा या निर्णयाचा फटका बसला. भाजपच्याही ४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे यांच्यासह ३ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. शेकापच्या समीर उमप यांनाही त्याचा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्ह्यात ओबीसीच्या चार जागा अतिरिक्त होत आहे. पण आयोग १६ ही रिक्त जागांवर निवडणुका घेणार आहे. निवडणुकीबाबत आयोगाकडून स्वतंत्रपणे कार्यक्रम जारी करण्यात येणार असल्याचेही निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

- पंचायत समितीच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द

जिल्ह्यातील कळमेश्वर, सावनेर, रामटेक, हिंगणा, उमरेड व भिवापूर पंचायत समितीतील १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या समित्यांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५७ टक्क्यांपासून ८० पर्यंत गेली होती. त्यामुळे ओबीसीच्या ८ जागा आयोगाने अतिरिक्त ठरविल्या आहे.

- तर होऊ शकतो सत्तापलट

जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसचे वर्चस्व आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने १६ नामप्रच्या जागांवर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या १६ मध्ये काँग्रेसचे ७ सदस्य आहे. शिवाय अनुसूचित जमाती प्रवर्गातील काँग्रेसच्या दोन सदस्यांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र ठरण्याची वेळ आली आहे. अशा ९ सदस्यांचा फटका काँग्रेसला बसणार आहे. फेर निवडणुकीत काँग्रेसने रिक्त झालेल्या जागा गांभीर्याने न घेतल्यास आणि भाजप ताकदीने रिंगणात उतरल्यास सत्तापालट होतांना वेळ लागणार नाही. काही जुने संदर्भही सत्तापरिवर्तनाला कारणीभूत ठरू शकतात.

- सदस्यत्व रद्द झालेले राजकीय पक्षाचे सदस्य

-काँग्रेस

मनोहर कुंभारे (केळवद)

ज्योती शिरसकर (वाकोडी)

अर्चना भोयर (करंभाड)

योगेश देशमुख (अरोली)

अवंतिका लेकुरवाळे (वडोदा)

ज्योती राऊत (गोधनी रेल्वे)

कैलास राऊत (बोथिया पालोरा)

- राष्ट्रवादी काँग्रेस

देवका बोडके (सावरगाव)

पुनम जोध (भिष्णूर सर्कल)

चंद्रशेखर कोल्हे (पारडसिंगा)

सुचिता ठाकरे (डिगडोह)

- भाजपा

अनिल निधान (गुमथळा)

राजेंद्र हरडे (नीलडोह)

अर्चना गिरी (डिगडोह-इसासनी)

भोजराज ठवकर (राजोला)

- शेकाप

समीर उमप (येनवा)