नागपूर शहरात पाणी मुबलक उपलब्ध आहे. पण शहराच्या सीमांवर वितरणाची व्यवस्था योग्य प्रमाणात नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाण्याच्या टाकीवरही नागरिकांना सहजपणे पाणी मिळत नाही. पण पिण्यासाठी पाणी तर हवेच. त्यासाठी मग कुठलेही दिव्य करायला नागरिक तयार होतात. गुंडभर पाण्यासाठी ही बालिका चक्क टँकरवरच चढली आणि आईला पाणी देऊ लागली. केवळ लातूरच नव्हे तर नागपूरच्या आजूबाजूलाही पाणी टंचाईने सध्या नागरिक त्रस्त आहेत, त्याचे हे बोलके छायाचित्र.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}