शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गरिबाचा भूखंड झाला बेपत्ता!

By admin | Updated: April 28, 2016 02:57 IST

अर्धवट उपाशीपोटी राहून, पै पै जमवून एका गरीब व्यक्तीने २७ वर्षांपूर्वी विकत घेतलेला भूखंड बेपत्ता झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष : तीन महिन्यानंतरही नोंदवला नाही ‘एफआयआर’राहुल अवसरे नागपूरअर्धवट उपाशीपोटी राहून, पै पै जमवून एका गरीब व्यक्तीने २७ वर्षांपूर्वी विकत घेतलेला भूखंड बेपत्ता झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी या फसवेगिरीची तक्रार होऊनही पोलिसांनी ‘एफआयआर’ नोंदवून न घेता, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्षच केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या ६८/२००८ क्रमांकाच्या फौजदारी रिट याचिकेत दखलपात्र स्वरूपाचा अपराध दिसत असल्यास प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदवणे अनिवार्य आहे, असा निवाडा देऊन दिशानिर्देश दिलेले आहेत. एखाद्या प्रकरणाच्या तक्रारीची चौकशीही सात दिवसांहून अधिक असू नये, विलंबाची वस्तुस्थिती आणि कारणाची नोंद पोलीस ठाण्यातील सामान्य नोंदपुस्तिकेत करणे अनिवार्य आहे, असेही दिशानिर्देशात नमूद करण्यात आलेले आहे.हुडकेश्वर आशीर्वादनगर येथे राहणाऱ्या महादेव व्यंकटी मलपेद्दीवार यांनी १९ एप्रिल १९८९ रोजी श्री शिवशक्ती गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या मौजा सोनेगाव येथील ८३ क्रमांकाचा २७३३ चौरस फुटाचा भूखंड विकत घेतला होता. रोजगारासाठी ते गुजरात राज्यातील सुरत येथे निघून गेले होते. सप्टेंबर २०१५ मध्ये ते नागपुरात परत आले. ते आपला भूखंड पाहण्यास गेले असता, तो बेपत्ता होता. भूखंडावर घर बांधलेले होते. मलपेद्दीवार यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर केला असता, खुद्द संस्थेच्या अध्यक्षाने एका महिलेला हा भूखंड ३ सप्टेंबर १९९४ रोजी विकल्याचे त्यांना समजले. आजच्या बाजारभावाप्रमाणे हा भूखंड एक कोटी रुपयांचा आहे. लागलीच मलपेद्दीवार यांनी १९ जानेवारी २०१६ रोजी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्याकडेही तक्रारी केल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप यांनी १८ मार्च २०१६ रोजी मलपेद्दीवार यांना या भूखंडाचे मूळ साक्षांकित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. ते त्यांनी सादरही केले. जगताप यांनी स्वत:च त्यांचे बयाणही नोंदवून घेतले. परंतु दुर्दैवाने अद्यापही एफआयआरची नोंदच करण्यात आलेली नाही. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या एफआयआर नोंदवण्याच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष केल्याने एका गरिबावर स्वत:चा भूखंड गमावण्याची पाळी आली आहे.