शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

क्रूरकर्मा आलोक जगत होता दुहेरी व्यक्तिमत्त्व ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नेहमीच्या भांडणांमुळे शेजाऱ्यांनी केले होते दुर्लक्ष जगदीश जोशी नागपूर : पत्नी, मुलांसह पाच जणांचा खून करून स्वत: आत्महत्या करणारा ...

नेहमीच्या भांडणांमुळे शेजाऱ्यांनी केले होते दुर्लक्ष

जगदीश जोशी

नागपूर : पत्नी, मुलांसह पाच जणांचा खून करून स्वत: आत्महत्या करणारा क्ररकर्मा आलोक दुहेरी व्यक्तिमत्त्व जगत होता. एकीकडे तो वस्तीमध्ये कुणी आवाज दिला तरी बोलायचे टाळत असे तर अमिषाच्या घरी मात्र तो गोेंधळ घालत भांडण करायचा. अमिषाचे शेजारीसुद्धा त्यांच्या नेहमीच्या भांडणांमुळे त्रस्त झाले होते. अमिषाची आई नेहमी शिवीगाळ करीत असल्याने शेजाऱ्यांनी त्या दोघींसोबत अंतर राखून ठेवले होते. त्यामुळेच रविवारी रात्री अमिषा आणि आलोकमध्ये सुरू असलेल्या भांडणांचा आवाज ऐकू येत असतानाही शेजारच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

या नरसंहारानंतर बागल अखाडा, पटवी मंदिर गल्लीतील वस्तीसह संपूर्ण पाचपावली परिसरात इतकी दहशत पसरली आहे की, आलोक व अमिषाच्या शेजाऱ्यांना प्रत्येक वेळी काहीतरी अपरिचित घडेल की काय, अशी भीती आहे. काही लोकांनी तर पत्नी आणि मुलाबाळांना दूर नातेवाईकांकडे पाठवून दिले आहे. वस्तीतील गल्ल्यांमध्ये खेळत असलेल्या मुलांचे ओरडणेही आता ऐकायला येत नाही. लोकमतने बुधवारी या परिसरातील लोकांशी चर्चा केली असता अनेक आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे आली. एक काळ असा होता जेव्हा अमिषा भाऊजी आलोकच्या खूप जवळ होती. त्याच्या व्यवसायात ती मदत करायची तर तिची आई शिलाईचे काम करायची. अमरावती येथून आल्यानंतर त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा आला होता. गेल्या पाच-सहा महिन्यापासून त्यांचे नाते अतिशय तणावपूर्ण झाले. आलोक जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा अमिषाच्या घरी येऊन वाद घालू लागला. छोट्या-छोट्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या शेजाऱ्यांपासून काहीही लपून नव्हते. भांडणाचा आवाज ऐकून शेजारी बाहेर आले की, लक्ष्मीबाई त्यांना शिवीगाळ करीत अपमानित करायची. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या भांडणाकडे लक्ष देणे सोडून दिले होते. अन्यथा रविवारी त्याच दिवशी हत्येची घटना उघडकीस आली असती.

आलोक जेव्हाही घरी येऊन वाद घालायचा तेव्हा लक्ष्मीबाई दरवाजा बंद करून घ्यायची. परत जाताना कुणी शेजारी दिसलाच तर आलोक त्यांना चिडवायचा. यावर शेजाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता. रविवार २० जून रोजी रात्री ११ वाजता आलोक अमिषाच्या घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाचा आवाज एका शेजाऱ्याला ऐकू येत होता. परंतु रोजचाच तमाशा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले.

अमिषाचे शेजारी ज्याचा खूप राग करायचे तो आलोक त्याच्या स्वत:च्या वस्तीमध्ये मात्र शांत स्वभावाचा होता. शेजाऱ्यांशी त्याची बोलचालही खूप कमी होती. पत्नी आणि मुलांना तो बाहेरही जाऊ देत नव्हता. याचे कारण विचारले असता विजयाने शेजारी महिलांना तो शंकेखोर वृत्तीचा असल्याचे सांगितले होते. आलोक मुलगी परीला ट्युशनला सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी स्वत: जायचा. काही दिवसांपूर्वीच तो मुलीला दुचाकी चालवणे शिकवत होता. मुलगा साहीलसोबत गल्लीत क्रिकेटही खेळायचा. आपल्या घराची व कुटुंबाची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून वस्तीतील लोक त्याला ओळखायचे.

बॉक्स

आमचे जगणे हराम केले

आलोकची पत्नी विजया अमिषावर खूप नाराज होती. तिने आमचे जगणे हराम केले असल्याचे विजया आपल्या महिला मैत्रिणींना सांगायची. अमिषाने अनेकदा आलोकच्या घरी येऊन भांडणही केले होते. तेव्हा विजया शिलाईच्या पैशावरून वाद असल्याचे शेजाऱ्यांना सांगायची. दोन महिन्यांपूर्वी आलोकने मोबाईल हिसकावला तेव्हाही अमिषाने आलोकच्या घरासमोर तमाशा केला होता. त्यावेळी विजया तिला घरात घेऊन गेली होती.

बॉक्स

वस्तीच्या नावाला काळीमा फासला

ज्या वस्तीत ही घटना घडली ती गरीब व मध्यमवर्गीय लोकांची वस्ती आहे. येथील लोकांसाठी खून किंवा मारहाण नवीन नाही. प्रत्येक गल्लीत दोन-चार दबंग वृत्तीचे लोक आहेत. परंतु या नरसंहाराची चर्चा करताच लोक संतापून जातात. त्यांचे म्हणणे आहे की, लहान मुलांची हत्या करून आलोकने वस्तीच्या नावाला काळीमा फासला आहे. प्रत्येक घरात मुली आहेत, परंतु कुणीची हिंमत नाही की त्यांच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू शकेल. मात्र वासनेने पछाडलेल्या आलोकने सर्वच हद्द पार केली.

बॉक्स

अमरावतीतही झाले होते भांडण

असे सांगितले जाते की, आलोक व अमिषा यांच्यात अमरावतीमध्येही वाद झाला होता. विजयाने आपल्या महिला मैत्रिणींना याबाबत सांगितले होते. त्या नरसंहाराच्या तीन दिवसांपूर्वीच आलोक व अमिषा अमरावतीला गेले होते. गेल्या आठवड्यात आलोकने लिपस्टीक-नेलपॉलिसचा बॉक्स आणि हेअर मशीन खरेदी केली होती. आलोक स्वत:सह आपल्या कुटुंबालाही स्टायलिश ठेवायचा. नागपूरला आल्यानंतरही आलोकला गारमेंट शिलाईचे काम नियमितपणे मिळत होते.