शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरकर्मा आलोक जगत होता दुहेरी व्यक्तिमत्त्व ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नेहमीच्या भांडणांमुळे शेजाऱ्यांनी केले होते दुर्लक्ष जगदीश जोशी नागपूर : पत्नी, मुलांसह पाच जणांचा खून करून स्वत: आत्महत्या करणारा ...

नेहमीच्या भांडणांमुळे शेजाऱ्यांनी केले होते दुर्लक्ष

जगदीश जोशी

नागपूर : पत्नी, मुलांसह पाच जणांचा खून करून स्वत: आत्महत्या करणारा क्ररकर्मा आलोक दुहेरी व्यक्तिमत्त्व जगत होता. एकीकडे तो वस्तीमध्ये कुणी आवाज दिला तरी बोलायचे टाळत असे तर अमिषाच्या घरी मात्र तो गोेंधळ घालत भांडण करायचा. अमिषाचे शेजारीसुद्धा त्यांच्या नेहमीच्या भांडणांमुळे त्रस्त झाले होते. अमिषाची आई नेहमी शिवीगाळ करीत असल्याने शेजाऱ्यांनी त्या दोघींसोबत अंतर राखून ठेवले होते. त्यामुळेच रविवारी रात्री अमिषा आणि आलोकमध्ये सुरू असलेल्या भांडणांचा आवाज ऐकू येत असतानाही शेजारच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

या नरसंहारानंतर बागल अखाडा, पटवी मंदिर गल्लीतील वस्तीसह संपूर्ण पाचपावली परिसरात इतकी दहशत पसरली आहे की, आलोक व अमिषाच्या शेजाऱ्यांना प्रत्येक वेळी काहीतरी अपरिचित घडेल की काय, अशी भीती आहे. काही लोकांनी तर पत्नी आणि मुलाबाळांना दूर नातेवाईकांकडे पाठवून दिले आहे. वस्तीतील गल्ल्यांमध्ये खेळत असलेल्या मुलांचे ओरडणेही आता ऐकायला येत नाही. लोकमतने बुधवारी या परिसरातील लोकांशी चर्चा केली असता अनेक आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे आली. एक काळ असा होता जेव्हा अमिषा भाऊजी आलोकच्या खूप जवळ होती. त्याच्या व्यवसायात ती मदत करायची तर तिची आई शिलाईचे काम करायची. अमरावती येथून आल्यानंतर त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा आला होता. गेल्या पाच-सहा महिन्यापासून त्यांचे नाते अतिशय तणावपूर्ण झाले. आलोक जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा अमिषाच्या घरी येऊन वाद घालू लागला. छोट्या-छोट्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या शेजाऱ्यांपासून काहीही लपून नव्हते. भांडणाचा आवाज ऐकून शेजारी बाहेर आले की, लक्ष्मीबाई त्यांना शिवीगाळ करीत अपमानित करायची. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या भांडणाकडे लक्ष देणे सोडून दिले होते. अन्यथा रविवारी त्याच दिवशी हत्येची घटना उघडकीस आली असती.

आलोक जेव्हाही घरी येऊन वाद घालायचा तेव्हा लक्ष्मीबाई दरवाजा बंद करून घ्यायची. परत जाताना कुणी शेजारी दिसलाच तर आलोक त्यांना चिडवायचा. यावर शेजाऱ्यांनी आक्षेपही घेतला होता. रविवार २० जून रोजी रात्री ११ वाजता आलोक अमिषाच्या घरी आला होता. त्यावेळी त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाचा आवाज एका शेजाऱ्याला ऐकू येत होता. परंतु रोजचाच तमाशा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले.

अमिषाचे शेजारी ज्याचा खूप राग करायचे तो आलोक त्याच्या स्वत:च्या वस्तीमध्ये मात्र शांत स्वभावाचा होता. शेजाऱ्यांशी त्याची बोलचालही खूप कमी होती. पत्नी आणि मुलांना तो बाहेरही जाऊ देत नव्हता. याचे कारण विचारले असता विजयाने शेजारी महिलांना तो शंकेखोर वृत्तीचा असल्याचे सांगितले होते. आलोक मुलगी परीला ट्युशनला सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी स्वत: जायचा. काही दिवसांपूर्वीच तो मुलीला दुचाकी चालवणे शिकवत होता. मुलगा साहीलसोबत गल्लीत क्रिकेटही खेळायचा. आपल्या घराची व कुटुंबाची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून वस्तीतील लोक त्याला ओळखायचे.

बॉक्स

आमचे जगणे हराम केले

आलोकची पत्नी विजया अमिषावर खूप नाराज होती. तिने आमचे जगणे हराम केले असल्याचे विजया आपल्या महिला मैत्रिणींना सांगायची. अमिषाने अनेकदा आलोकच्या घरी येऊन भांडणही केले होते. तेव्हा विजया शिलाईच्या पैशावरून वाद असल्याचे शेजाऱ्यांना सांगायची. दोन महिन्यांपूर्वी आलोकने मोबाईल हिसकावला तेव्हाही अमिषाने आलोकच्या घरासमोर तमाशा केला होता. त्यावेळी विजया तिला घरात घेऊन गेली होती.

बॉक्स

वस्तीच्या नावाला काळीमा फासला

ज्या वस्तीत ही घटना घडली ती गरीब व मध्यमवर्गीय लोकांची वस्ती आहे. येथील लोकांसाठी खून किंवा मारहाण नवीन नाही. प्रत्येक गल्लीत दोन-चार दबंग वृत्तीचे लोक आहेत. परंतु या नरसंहाराची चर्चा करताच लोक संतापून जातात. त्यांचे म्हणणे आहे की, लहान मुलांची हत्या करून आलोकने वस्तीच्या नावाला काळीमा फासला आहे. प्रत्येक घरात मुली आहेत, परंतु कुणीची हिंमत नाही की त्यांच्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू शकेल. मात्र वासनेने पछाडलेल्या आलोकने सर्वच हद्द पार केली.

बॉक्स

अमरावतीतही झाले होते भांडण

असे सांगितले जाते की, आलोक व अमिषा यांच्यात अमरावतीमध्येही वाद झाला होता. विजयाने आपल्या महिला मैत्रिणींना याबाबत सांगितले होते. त्या नरसंहाराच्या तीन दिवसांपूर्वीच आलोक व अमिषा अमरावतीला गेले होते. गेल्या आठवड्यात आलोकने लिपस्टीक-नेलपॉलिसचा बॉक्स आणि हेअर मशीन खरेदी केली होती. आलोक स्वत:सह आपल्या कुटुंबालाही स्टायलिश ठेवायचा. नागपूरला आल्यानंतरही आलोकला गारमेंट शिलाईचे काम नियमितपणे मिळत होते.