शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

यंदा जाणवेल कडाक्याची थंडी; ‘ला-निनाे’ इफेक्ट; डिसेंबर-जानेवारीत विक्रमी गारठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 8:24 PM

Nagpur News उत्तर भारतात थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता असून त्याचे परिणाम विदर्भ व महाराष्ट्रातही जाणवतील. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाेकांना कडाक्याची थंडी सहन करावी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नागपूर : उत्तर गाेलार्धावरील देशांमध्ये यावर्षी थंडीचा प्रकाेप जास्त जाणवणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पश्चिम युराेप तसेच पूर्व आशियायी देशांमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. ‘ला-निनाे इफेक्ट’चा प्रभाव भारतावरही पडणार आहे. उत्तर भारतात थंड हवेच्या लाटा येण्याची शक्यता असून त्याचे परिणाम विदर्भ व महाराष्ट्रातही जाणवतील. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लाेकांना कडाक्याची थंडी सहन करावी लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (It will be very cold this year; ‘La-Ninae’ effect)

भारतीय हवामान विभागानुसार मागीलवर्षीही ला-निनाे इफेक्टमुळे थंडी वाढली हाेती. पण त्याचा प्रभाव कमी हाेता. यावर्षीही ला-निनाेचा प्रभाव राहणार आणि परिस्थिती अधिक कडक राहणार असल्याचे विभागाने व्यक्त केले आहे. नाेव्हेंबर महिन्यात प्रभाव वाढून थंडी वाढायला सुरुवात हाेईल. त्यानंतर डिसेंबर व जानेवारी महिन्यात तापमानात विक्रमी घट हाेण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पॅसिफिक महासागराचे तापमान कमी हाेत असून थंडी वाढत आहे. त्यालाच ला-निनाेचा हा प्रभाव म्हणतात. विशेष म्हणजे नासाच्या ‘नाेआ’ तसेच ‘वेदर डाॅट काॅम’ या हवामान संस्थांनी उत्तर गाेलार्धात परिस्थिती बिकट हाेणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

कॅनडा, सायबेरिया तसेच पश्चिम युराेपातील देशांमध्ये अतिशय थंड हवेच्या लाटा तसेच बर्फाचे वादळ व बर्फवृष्टी हाेण्याची शक्यता आहे. त्याच्याच प्रभावातून पूर्व आशियायी देशांत थंड हवेच्या लाटा येतील. उत्तर भारतात थंड हवेच्या लहरी येतील आणि विदर्भासह महाराष्ट्रातही गारठा वाढेल, असा अंदाज आहे.

आतापर्यंत सर्वात कमी तापमान

नागपूर : ७ जानेवारी १९५७- ३.९ अंश, २०११- ५.६ अंश, २०१३-५.७, २०१६-५.१ अंश

चंद्रपूर : १०/१/१८९९- २.५ अंश, २/२/१९८५- ३.९ अंश, ११/१२/२०००- ३.५ अंश, २३/११/१९६८-६.२ अंश

ब्रम्हपुरी : ३ जानेवारी १९९१-०.८ अंश, १९९२-२.६ अंश,

अकाेला : ९ फेब्रुवारी १९८७ - २.२ अंश

वर्धा : २९ डिसेंबर २०१८ - ६.२ अंश

अमरावती : ९ फेब्रुवारी १९८७ - ५ अंश

यवतमाळ : १९ डिसेंबर २०१० - ६.२ अंश

ला-निनाे मुळे यावर्षी थंडीचा प्रकाेप अधिक जाणवणार आहे. शिवाय वाढते तापमान हे सुद्धा थंडीच्या लाटा येण्यास कारणीभूत ठरतात. उन्हाळ्यात तापमान जेवढे अधिक असेल तेवढे ते हिवाळ्यात घटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे भारतात थंडीचा प्रभाव मागील वर्षाच्या तुलनेत जास्त राहील. हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी वाढेल आणि उत्तर भारतात थंडीचा प्रकोप वाढेल. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात थंडी आणि थंडीच्या लहरी येतील.

- प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :weatherहवामान