शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या प्रगल्भतेनेच कोरोनाचा पराभव शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:09 IST

सरकारच्या दिशा-निर्देशांचे पालन करू तरच कोरोनाचा पराभव होईल आणि भारत सुरक्षित राहील.

ठळक मुद्देसोशल डिस्टेन्सिंग होम क्वॉरंटाईनचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून देशाला मुक्त करण्याच्या कार्यात आपणा सगळ्यांचीच भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला होम क्वॉरंटाईन करत, सोशल डिस्टेन्सिंग पाळत प्रत्येकालाच देशहिताचे कर्तव्य पार पाडावे लागणार आहे. सरकारच्या दिशा-निर्देशांचे पालन करू तरच कोरोनाचा पराभव होईल आणि भारत सुरक्षित राहील. लॉकडाऊनच्या काळात घराच्या बाहेर निघणाऱ्या व सोशल डिस्टेन्सिंग न पाळणाºया मुस्लिम समाजाला जबाबदार नागरिकांनी समजदारी दाखविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.लॉकडाऊन पाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा: प्रशासनाच्या इशाऱ्याकडे काही लोक दुर्लक्ष करत आहेत आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. यामुळे आपलेच नुकसान आहे. यामुळे आपण आपल्या कुटुंबाला आणि देशाला संकटात टाकतो आहोत. आपल्या निष्काळजीपणाची शिक्षा संपूर्ण देशाला भोगावी लागेल. सोशल डिस्टेन्सिंग पाळल्याने कोरोनाशी लढता येईल. आपण आपले व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करू शकतो. त्यामुळे सर्वांनीच भारताला कोरोनामुक्त करण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मौलाना सैयद आलमगीर अशरफ यांनी केले आहे.सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने विश्व स्वास्थ्य संघटनेच्या मार्गदर्शिकेनुसार योग्य पाऊले उचलली आहेत. त्याअनुसार सोशल डिस्टेन्सिंग जपणे, मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करणे आणि होम क्वॉरंटाईनमध्ये राहणे गरजेचे आहे. आपण कुटूंबीयांसोबत घरीच राहून या संकटाला निस्तारण्यास सरकारला सहकार्य करू शकतो. कोरोनाला रोखण्यासाठी हे अत्यंत गरजेचे असल्याचे नागपूर मरकजचे सचिव हाजी अब्दुल बारी पटेल यांनी म्हटले आहे.पैगंबरांनीही म्हटले होते घरी राहा : मोहम्मद पैगंबरांनीही अशा प्रकारच्या महामारीच्या काळात घरी राहण्याचे आवाहन केले होते. याचा उल्लेख हदीसे नबवीमध्ये आलेला आहे. अशाच प्रकारची महामारी त्यांच्या काळातही आली होती. त्यावेळी त्यांनी नागरिकांना घरी राहून एकदुसऱ्याशी दूर राहण्याची सूचना केली होती. ज्या प्रमाणे वाघ पुढे येताच आपण त्यापासू दूर पळतो. त्याच प्रमाणे ही महामारी आहे. म्हणूनच सोशल डिस्टेन्सिंग पाळून कुटूंबाला व देशाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन शिक्षणतज्ज्ञ जफर अहमद खान यांनी केले आहे.कोरोनाला हरविण्याची जबाबदारी आपलीच :आपल्या निष्काळजीपणामुळेच कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. या वैश्विक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने बाहेर निघण्यास मनाई केले आहे. याच प्रक्रीयेने कोरोनाला हरविता येणारआहे. आपल्याच समजदारीने भारत कोरोनामुक्त होईल. लॉकडाऊन आपल्या हिताचे असल्याची भावना मस्जिद अन्सार कमेटीचे अध्यक्ष हाजी मो. अलीमुद्दीन यांनी व्यक्त केली आहे.होम क्वॉरंटाईन गरजेचे : सरकारने सगळ्यांच्याच फायद्यासाठी नियमावली तयार केली आहे आणि उपाययोजना सादर केल्या आहेत. सरकारच्या आदेशाचे पालन करत प्रत्येकाने स्वत:ला घरामध्ये क्वॉरंटाईन करणे गरजेचे आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ही चिंतेची बाब असून, यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सरकार व प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे समाजसेवक अफजल फारुख यांनी म्हटले आहे.कोरोना विरूद्ध आपल्याला लढायचे आहे : सरकारने जबाबदारीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. सरकारचे हे पाऊल पूर्णपणे जनहित, देशहिताचे आहे. आपण या नियमांचे पालन करणार नाही तर स्थिती बिकट होईल. त्यामुळे घरी राहून सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करावेच लागेल असे आवाहन मरकजी सिरतुन्नबी कमेटीचे अध्यक्ष परवेज रिजवी यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस