शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

हरभऱ्यावर घाटेअळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST

रामटेक : हरभऱ्याचे पीक फुलाेऱ्यावर यायचे असून, त्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली आहे. घाटेअळीमुळे हरभऱ्याचे ३० ते ४० ...

रामटेक : हरभऱ्याचे पीक फुलाेऱ्यावर यायचे असून, त्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली आहे. घाटेअळीमुळे हरभऱ्याचे ३० ते ४० टक्के नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययाेजना कराव्या, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी केले आहे.

घाटेअळीचा मादी पतंग नवतीच्या पाने, कोवळा शेंडा, कळ्या व फुलावर खसखसच्या आकाराची अंडी घालताे. या अंड्यातून साधारणत: दोन-तीन दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी सुरुवातीला पानावरील हरितद्रव्य खात असल्याने पाने पिवळी व पांढरी हाेऊन ती वाळतात व नंतर गळतात. या अळ्या मोठ्या झाल्यावर झाडांची पूर्ण पाने, कोवळी देठे फस्त करतात. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास झाडांच्या केवळ फांद्या शिल्लक राहतात. या अळ्या फुले व घाटे पोखरत असल्याने हरभऱ्याचे ३० ते ४० टक्के नुकसान हाेऊ शकताे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढू शकताे.

....

हे उपाय करा

पिकात नैसर्गिक पक्षी थांबे नसल्यास बांबूचे प्रति हेक्टरी २० त्रिकोणी पक्षी थांबे तयार करावे. पक्षी अळ्या वेचून खातात. एकरी दाेन किंवा हेक्टरी पाच कामगंध सापळे पिकापेक्षा उंच तयार करून त्यात कामगंध गाेळी ठेवावी. दोन-तीन दिवसात आठ-दहा घाटेअळीचे नर पतंग आढळल्यास घाटे ते याेग्य व्यवस्थापन समजावे. पिकाचे वेळावेळी निरीक्षण करावे. पिकात एक-दाेन घाटेअळ्या प्रति मीटर ओळीत आढळल्यास आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे अळीच्या व्यवस्थापनासाठी पीक ४० ते ५० टक्के फुलाेऱ्यावर आताना पाच टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉसची पहिली फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांनी इमामेक्टीन बेंजोएट, किंवा इथिऑन किंवा क्लाेरॅन्ट्रानिलिप्राेलची दुसरी फवारणी करावी. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी दिली.